शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

अभूतपूर्व विजयासाठी ममता दिदींनी मानले मतदारांचे आभार

By admin | Published: May 19, 2016 12:22 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बाजी मारत राज्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा बाजी मारत राज्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. पाच वर्षांपूर्वी बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या ममता दिदींना यावेळीही मतदारांनी भरघोस साथ दिलू असून तृणमूलने २९५ पैकी २१८ जागांवर आघाडी घेत डावे व काँग्रेसच्या आघाडीला जोरदार धक्का दिला. या अभूतपूर्व विजयाबद्दल ममता दीदींनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले आहेत. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
 
' हा मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल मी पश्चिम बंगालच्या मतदारांचे खूप आभार मानते. बंगालच्या जनतेची दिशाभूल करण्यात आली तसेच विरोधकांनी त्यांना घाबरवण्याचाही प्रयत्न केला. मात्र जनतेने शांततेत मतदान करून आपला कौल कोणाला आहे ते स्पष्ट केले' अशी प्रतिक्रिया ममता यांनी विजयानंतर व्यक्त केली. ' गेल्या दोन वर्षांपासून आमच्याविरोधात खूप अपप्रचार करण्यात आला, आमच्यावर अनेक आरोप करण्यात आले.  मात्र मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून, ते आरोप नाकारून, आम्हाला दणदणीत विजय मिळवून दिला यासाठी मी त्यांचे आभार मानते. यावेळी आम्ही एकट्याने लढा दिला,' असेही त्या म्हणाल्या. पश्चिम बंगाल हे भ्रष्टाचारमुक्त राज्य असल्याचा दावाही बॅनर्जी यांनी यावेळी केला. 
दरम्यान गेल्या निवडणुकीत तृणमूलचे १८४ आमदार विजयी झाले होते, यावेळेस मात्र तृणमूलने जोरदार आघाडी घेतल्याने आता प.बंगाल विधानसभेत तृणमूलचे २०० हून अधिक शिलेदार असतील, असेच चित्र दिसत आहे.