शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

तो हल्ला दहशतवादीच! पाच जवान शहीद; लष्करी वाहन आग प्रकरणी मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 8:05 PM

भर पावसात भ्याड हल्ला, कमी प्रकाशाचा फायदा घेत आधी गोळीबार केला, नंतर ग्रेनेड फेकले....

जम्मू काश्मीरमधील पूँछ-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी भर पावसात भारतीय सैन्याच्या लष्करी वाहनाने पेट घेतला होता. या आगीत वाहन जळून खाक झाले असून पाच जवान शहीद झाले आहेत. सुरुवातीला वीज पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतू दहशतवाद्यांनी वाहनावर ग्रेनेड फेकल्याने आग लागल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. 

या वाहनातून एकूण सहा जवान प्रवास करत होते. यापैकी पाच जण शहीद झाले आहेत. तर एक गंभीर जखमी झाला आहे. या जवानावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. राष्ट्रीय रायफल युनिटचे हे जवान दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्यावर मोहिमेवर जात असताना हा हल्ला झाला आहे. 

आर्मीच्या ट्रकवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यानंतर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. मुसळधार पाऊस आणि कमी प्रकाशाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि पळून गेले आहेत. ग्रेनेड वाहनात फुटल्याने आग लागली, यात जखमी झालेले जवान होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला. 

दहशतवाद्यांचा शोध घेण्य़ासाठी सैन्याने शोधमोहिम हाती घेतली आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हा मार्ग बंद केला आहे. लोकांना दुसऱ्या मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानfireआगTerror Attackदहशतवादी हल्ला