शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बँक घोटाळ्यातील रक्कम वसूल करणार; तक्रारीला विलंब नाही, SBI चं म्हणणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 08:23 IST

एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही.

नवी दिल्ली : एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेल्या बँकेच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यामुळे बँकांच्या ताळेबंदावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच वेळी, आम्ही शक्य तितकी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करू, असे एसबीआयने म्हटले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वाखाली २ डझनहून अधिक लोकांना कन्सोर्टियम व्यवस्थेअंतर्गत कर्ज देण्यात आले होते. खराब कामगिरीमुळे नोव्हेंबर २०१३ मध्येच कंपनीचे खाते एनपीए झाले. कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये यश आले नाही, असे एसबीआयने म्हटले.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयला अन्य बँकांकडून तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृत करण्यात आले. सर्वात पहिली तक्रार नोव्हेंबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आली होती. २०२१ मध्ये एक सर्वसमावेशक तक्रार दाखल करण्यात आली. यामध्ये बँकांकडून कोणताही उशीर झालेला नाही. शिपयार्ड २०१३ पासून तोट्यात आहे, असे बँकेने म्हटले आहे.

मोदींच्या कार्यकाळात ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक : राहुल गांधी

एबीजी शिपयार्ड प्रकरणावरून सर्व बाजूंनी सरकारवर टीका होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया