शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

बँक घोटाळ्यातील रक्कम वसूल करणार; तक्रारीला विलंब नाही, SBI चं म्हणणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 8:22 AM

एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही.

नवी दिल्ली : एबीजी शिपयार्ड लिमिटेडने केलेल्या बँकेच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यामुळे बँकांच्या ताळेबंदावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच वेळी, आम्ही शक्य तितकी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करू, असे एसबीआयने म्हटले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वाखाली २ डझनहून अधिक लोकांना कन्सोर्टियम व्यवस्थेअंतर्गत कर्ज देण्यात आले होते. खराब कामगिरीमुळे नोव्हेंबर २०१३ मध्येच कंपनीचे खाते एनपीए झाले. कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये यश आले नाही, असे एसबीआयने म्हटले.

एबीजी शिपयार्ड लिमिटेड २००१ पासून सुमारे २८ बँकांकडून कर्ज घेत होते. मात्र, कंपनी दीर्घकाळ यशस्वीपणे काम करू शकली नाही. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयला अन्य बँकांकडून तक्रार दाखल करण्यासाठी अधिकृत करण्यात आले. सर्वात पहिली तक्रार नोव्हेंबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आली होती. २०२१ मध्ये एक सर्वसमावेशक तक्रार दाखल करण्यात आली. यामध्ये बँकांकडून कोणताही उशीर झालेला नाही. शिपयार्ड २०१३ पासून तोट्यात आहे, असे बँकेने म्हटले आहे.

मोदींच्या कार्यकाळात ५ लाख ३५ हजार कोटींची बँक फसवणूक : राहुल गांधी

एबीजी शिपयार्ड प्रकरणावरून सर्व बाजूंनी सरकारवर टीका होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया