शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

आजोबांचा भलताच हट्ट...! 11 दिवसांनी कबरीतून पुन्हा बाहेर काढला नातीचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 8:13 PM

उत्तर प्रदेशातील संभल येथे 11 दिवसांपूर्वी झालेल्या नवजात मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील संभल येथे 11 दिवसांपूर्वी झालेल्या नवजात मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आहे. खरं तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या (DM) आदेशानुसार नवजात मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पैसे न दिल्याने सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन न दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या परिजनांनी आयजीआरएस पोर्टल आणि कोर्टात तक्रार केली होती.

दरम्यान, चंदौसी परिसरात राहणाऱ्या गायत्री या महिलेला 11 दिवसांपूर्वी प्रसूती वेदना होत असल्याने चंदौसी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. इथे महिलेने रुग्णालयात नवजात बाळाला जन्म दिला, मात्र काही तासांतच या नवजात मुलीचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयातील महिला डॉक्टर सारिका अग्रवाल आणि स्टाफ नर्स यांच्यावर लाचेची रक्कम न दिल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मोठा गदारोळ घातला. 

11 दिवसांनंतर मृतदेह काढला बाहेर मात्र काही वेळानंतर नातेवाईकांनी नवजात मुलीला तलावाच्या काठावर पुरून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. नवजात मुलीच्या मृत्यूनंतर तिचे आजोबा गोकिल सिंग यांनी रूग्णालय प्रशासनाविरूद्ध कारवाईची मागणी केली. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल IGRS पोर्टलवर तक्रार केली आणि न्यायालयात 156 (3) चा खटला देखील दाखल केला. यानंतर संभल जिल्ह्याचे डीएम मनीष बन्सल यांच्या आदेशानुसार आयजीआरएस आणि कोर्टामार्फत केलेल्या तक्रारीची दखल घेत नवजात मुलीचा मृतदेह पोलिसांच्या मदतीने 11 दिवसांनंतर कबरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नवजात मुलीचा मृतदेह सील करून शवविच्छेदनासाठी पाठवण्याची कारवाई सुरू केली.  

मृत मुलीचे आजोबा गोकुल सिंग यांच्या म्हणण्यानुसार, 28 ऑक्टोबर रोजी त्यांनी त्यांच्या सुनेला प्रसूतीसाठी चांदौसी सीएससीमध्ये दाखल केले होते, त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर सारिका आणि स्टाफ नर्स रुची यांनी 5 हजार रूपयांची मागणी केली होती आणि त्यांना पैसे देऊनही मुलीला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे नवजात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. लक्षणीय बाब म्हणजे मुलगी जिवंत असल्याचे सांगून तिला आमच्याकडे स्वाधीन केल्याचा आरोपही मुलीच्या आजोबांनी केला आहे. 

रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली धमकी मृत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, त्यांनी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांविरूद्ध आवाज उठवला असता त्यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खटल्यात अडकवण्याची धमकी दिली. गोकुल सिंग म्हणाले की, "न्यायाच्या मागणीबाबत मी डीजीपी, आयुक्त आणि आयजीआरएस पोर्टलवर तक्रार केली होती. त्या दिवशी मुलीच्या मृत्यूनंतर मी माझ्या सुनेवर प्रथम उपचार केले होते, कारण तिचा मृत्यू झाला असता तर तिच्या माहेरच्या लोकांनी आमच्यावर कारवाई केली असती, आज मुलीचा मृतदेह उचलला जात आहे. बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येत आहे."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस