शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

दोषी नेत्यांवर आजीवन बंदी घालू नये, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली विनंती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 20:57 IST

Central Government : न्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला आहे. अशा प्रकारे दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजीवन बंदी घालू नये, अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

गुन्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेला केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला आहे. अशा प्रकारे दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजीवन बंदी घालू नये, अशी विनंती केंद्र सरकारनेसर्वोच्च न्यायालयात केली आहे. दरम्यान, अशा प्रकारे अयोग्य ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे संसदेच्या अधिकार क्षेत्रात येतो, असा दावाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

या संदर्भात केंद्र सरकारने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे की, प्रस्तुत याचिकेमधून करण्यात आलेली मागणी ही कायदा नव्याने लिहिण्यास सांगण्यासारखी किंवा संसदेला एक विशिष्ट्य पद्धतीचा कायदा तयार करण्याचे आदेश देण्यासारखी आहे. ही बाब न्यायालयीन समीक्षेच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर आहे. आता आजीवन बंदी घालणं योग्य ठरेल की नाही, ही बाब पूर्णपणे संसदेच्या अधिकार क्षेत्रात येणारी आहे.

केंद्र सरकारने या शपथपत्रात म्हटले आहे की, दंडात्मक कारवाई आणि दंडाला योग्य कालावधीपर्यंत मर्यादित ठेवल्याने सुधारणा सुनिश्चित करता येतात. तसेच अकारण होणाऱ्या सक्तीपासून वाचता येते. दंडाच्या प्रभावाला वेळेच्या आधारावर मर्यादित करणं ही काही बेकायदेशीर बाब नाही. तर दंड हा वेळेच्या आधारावर किंवा परिणामांच्या आधारावर मर्यादित असतो, हा कायद्याचा स्थापित सिद्धांत आहे, असेही केंद्राने शपथपत्रात पुढे म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार