शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

"असामचं भविष्य असुरक्षित, आम्ही अल्पसंख्याक झालोय", हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केली भीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 15:40 IST

Himanta Biswa Sarma News: आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे या राज्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर झपाट्याने बिघडत आहे. आता सरमा यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदन केल्यानंतर हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे या राज्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर झपाट्याने बिघडत आहे. आता सरमा यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

सरमा म्हणाले की, आता आसाममधील मुळनिवासी हे बचावात्मक भूमिकेत गेले आहेत.  आसाममधील बारा तेरा जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. असामचं भविष्य आमच्यासाठी सुरक्षित राहिलेलं नाही. संपूर्ण राज्यात हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येमधील संतुलन हे वेगाने संपुष्टात येत आहे. राज्यातील मुस्लिम लोकसंख्या २०२१ मध्ये वाढून ४१ टक्के झाली आहे. तर हिंदू लोकसंख्या घटून ५७ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. उर्वरित लोकसंख्येमध्ये ख्रिश्चन आणि इतरांचा समावेश आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अधिकृत भाषणांमधून दिली आहे. 

ते पुढे म्हणाले की, हिंदू लोकसंख्या ६०-६५ टक्क्यांवरून घटून ५० टक्क्यांपर्यंत येत आहे, ही चिंतेची बाब आहे. हा काळ संकटाचा आहे. मी लोकसंख्येचं संतुलन प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी सर्व हिंदू, मुस्लिम आणि इतरांना कुटुंब नियोजना संबंधीच्या नियमांचे पालन करण्याचं आवाहन करतो. तसेच समाजातील प्रत्येक वर्गात होणाऱ्या बहुविवाहाबाबत आपण सतर्क राहिलं पाहिजे, असेही ते म्हणाले. 

हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केलं ही, आम्ही १२-१३ जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक झालो आहोत. जर भक्कम सरकार नसेल तर मुलनिवासींसाठी प्रत्येक पावलावर संकट असेल. मी सूर्याचा प्रकाश नाही. पण मुलनिवासींच्या हितांच्या रक्षणासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मेणबत्तीप्रमाणे उभा राहीन, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत