शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
4
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
5
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
6
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
7
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
8
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
9
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
10
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
11
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
13
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
15
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
16
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
17
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
18
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
19
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
20
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा

महायुती सरकारने ठरावीक कंपन्यांनाच दिला लाभ; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:29 PM

करदात्यांच्या १० हजार ९०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महायुती सरकारने पायाभूत क्षेत्रांशी संबंधित काही प्रकल्पांत निधीच्या मोबदल्यात काही ठरावीक कंपन्यांनाच लाभ दिला असल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला. यात करदात्यांचे किमान १०,९०३ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘निवडणूक बाँड’नंतरचा हा एक महाघोटाळा असल्याचा दावा केला. दरम्यान, या आरोपानंतर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर हा आरोप करताना रमेश यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील महायुती सरकारने निवडणुकीसाठी निधीपोटी काही कंपन्यांना निविदा प्रक्रियेत विशेषाधिकार दिले.’ काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकारांना सांगितले, ‘राज्य सरकारला कर स्वरूपात जनतेने दिलेल्या पैशावर राज्य सरकारने डल्ला मारला आहे.’

पूर्वी ‘निधी द्या, धंदा घ्या’ असेच सुरू होते. याला सर्वोच्च न्यायालयाने लगाम घातला. तेव्हापासून पैसा घेण्यासाठी नवनवीन योजना तयार केल्या जात असल्याचे खेरा म्हणाले. राज्य रस्ते विकास महामंडळ, विविध राज्यमार्ग योजनांसह पुणे रिंगरोडसाठी निविदा काढण्यात आल्याचे सांगून निविदांबाबतचे निकष राज्य सरकारने बदलल्याचा आरोप त्यांनी केला.

हे आहेत काँग्रेसचे आरोप- कोणत्याही कंपनीला दोनपेक्षा अधिक प्रकल्पांचे काम मिळू शकत नाही. मात्र, येथे दोन कंपन्यांना चार-चार प्रकल्पांचे कंत्राट दिले गेले.- एखाद्या कंपनीला बोगदा बांधण्याचा अनुभव हवा असा एक निकष होता. मात्र, या कामात बोगद्याचे काम फक्त १० टक्केच आहे. तरीही हे काम बोगद्याचे काम म्हणून मंजूर करण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार