शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देशाची अर्थव्यवस्था बुडाली हेच नोटबंदीचे मोठे यश; काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:07 IST

बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते.

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था बुडविणे हेच मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे यश आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.५०० व २००० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रमाणात अनुक्रमे १०० टक्के व ५० टक्के वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. त्याबाबतच्या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी सांगितले की, ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर मोदी सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनंतर बनावट नोटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ते म्हणाले की, अर्थव्यवस्था बुडविण्याचे काम मोदी सरकारने नोटबंदीच्या निर्णयाद्वारे केले.

बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते. मात्र बनावट नोटांची संख्या वारेमाप वाढत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. त्याबाबत मोदी सरकार काही बोलणार आहे की नाही?देशातील काळ्या पैशाची समस्या संपविण्यासाठी तसेच दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी लागू केली होती. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आला होता.

शिवसेनेचीही टीकाशिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक शैलीत म्हणाल्या की, बनावट नोटांचे प्रमाण वाढणे हा नोटबंदीच्या निर्णयाचा एक मोठा फायदा असावा असे वाटू लागले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाDemonetisationनिश्चलनीकरण