शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा सुनावणीत ‘गेमचेंजर’; पाच मुद्दे घटनापीठाने फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 08:37 IST

विजयाचा दावा पोकळ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांनी दिलेला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ‘गेमचेंजर’ ठरला, असे मत राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांच्या वतीने उपस्थित करण्यात आलेले सातपैकी पाच मुद्दे घटनापीठाने फेटाळून लावले असून त्यांनी केलेला विजयाचा दावा पोकळ असल्याचा टोला जेठमलानी यांनी लगावला.

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर तीन ते सहा महिन्यांत निर्णय घेतील, अशी अपेक्षा जेठमलानी यांनी व्यक्त केली.

विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तिथेच त्यांचा खेळ संपला आणि याच मुद्याने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला कलाटणी दिली, असे जेठमलानी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या विधिज्ञांमध्ये जेठमलानी यांचा समावेश होता.

उद्धव ठाकरे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकांमध्ये एकूण सात मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. त्यापैकी केवळ दोनच मुद्दे मान्य करून घटनापीठाने पाच मुद्दे फेटाळून लावले, असे जेठमलानी म्हणाले.

गाेगावले पुन्हा मुख्य प्रतोदपदी?

राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश द्यायला नको होते, हा त्यातील पहिला मुद्दा होता; पण उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेलेच नाही. त्यामुळे तो मुद्दा आधीच निष्प्रभ ठरला होता.

दुसरा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून दिलेली मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली आहे; पण गोगावलेंची नियुक्ती रद्दबातल करताना त्यांची पुन्हा मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेली नाही.

शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार भरत गोगावलेंच्या नियुक्तीवर पुन्हा विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारची वैधता मान्य केली आहे, तरीही आमचीच सरशी झाली असे उद्धव ठाकरे म्हणत असतील तर तो पोकळ विजय ठरला आहे, अशी टीका जेठमलानी यांनी केली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे