शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

'जंगलाचा राजा सिंहच असतो, २०२४मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार'; CM शिंदेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 8:57 AM

महाराष्ट्रात अनेक प्रकल्प रखडलेली होती. परंतु आम्ही सत्तेत येताच सर्व कामे सुरु केली, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले. 

नवी दिल्ली: श्रीनगर येथे 'सरहद' संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या 'हम सब एक है' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, 'सरहद' संस्थेचे संजय नहार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात अमरनाथ यात्रा तसेच कोविड काळात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील ७३ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या नागरिकांना 'वन इंडिया रिंग'ने सन्मानित करण्यात आले. 

महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरला निसर्गाचे अपूर्व वरदान लाभले आहे. महाराष्ट्र आणि काश्मीर दोन्ही राज्यांत पर्यटनाच्या अमर्याद संधी असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. काश्मिरच्या तरुणांसाठी 'सरहद' संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काश्मीरशी दृढ ॠणानुबंध होते, याचा एकनाथ शिंदेंनी आवर्जून उल्लेख केला. 

'सरहद' संस्थेने मानवतेच्या क्षेत्रात आगळे काम केले आहे. संस्था आपत्कालीन आणि अगदी कोविडच्या संकटात धावून आली आहे. संस्थेच्या माध्यमातून पुण्यात काश्मिरी तरुणांसाठी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, महत्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या शिक्षणातील आरक्षणासाठी वंदनीय बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितली. तसेच श्रीनगर येथील मराठी नागरिकांशी संवाद साधल्यावर, 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' हीच छत्रपती शिवरायांची शिकवण अंगिकारून आपले मराठी बांधव दोन राज्यात परस्पर मंत्री आणि सहकार्याचा अभेद्य सेतू उभारतील याची मनोमन खात्री पटल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. 

२०२४मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार-

श्रीनगर दौऱ्यावर असताना एनकाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला. यावेळी २०२४मध्ये देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले. सर्व विरोधक विचार करताय की, नरेंद्र मोदींना कसे हरवता येईल. तसेच जंगलातील बकऱ्यांसह अन्य प्राणी एकत्र आले तरी सिंहासोबत लढता येत नाही, कारण सिंह हा सिंह असतो आणि जंगलात त्याचच चालतं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार होतं, आता अजित पवार देखील आमच्यासोबत सामील झाले आहेत. आधी इगो वाल्याचं सरकार होतं. त्यावेळी अनेक प्रकल्प रखडलेली होती. परंतु आम्ही सत्तेत येताच सर्व कामे सुरु केली, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार