शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

...तर भोलेबाबांचीही चौकशी,  २ महिलांसह ६ सेवेकरी अटकेत; 'त्या'साठी १ लाखाचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:51 IST

फरार आरोपी देवप्रकाश मधुकर याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

मैनपुरी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमस्थळी सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व सध्या फरार असलेला मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याला पकडून देणाऱ्यास पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. आवश्यकता वाटल्यास भोलेबाबाचीही पोलिस चौकशी करणार आहेत.

राम लडाईत (वय ५० वर्षे), उपेंद्र यादव (६२), मेघ सिंग (६१), मुकेश कुमार (३८) तसेच महिलांपैकी मंजू यादव (३०) आणि मंजू देवी (४०) अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. हाथरस येथे २ जुलै रोजी सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. सत्संगाला ८० हजार लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती; पण प्रत्यक्षात अडीच लाख लोक हजर राहिले, असे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

भोलेबाबाचा मुख्य सेवेकरी झाला फरारमुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर हाथरसच्या सिकंदराराऊ येथील रहिवासी असून तो भोलेबाबा यांचा निकटवर्तीय आहे. त्याचे घर सध्या बंद असून तो परिवारासहित फरार झाला असल्याचे सांगण्यात आले. मैनपुरी येथील भोलेबाबांच्या आश्रमामध्ये पोलिसांनी बुधवारी रात्री प्रवेश केला होता. 

दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यताउत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  या दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले होते. चौकशी समिती आपला अहवाल दोन महिन्यांत सरकारला सादर करणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सर्व मृतदेहांची ओळख पटलीहाथरस येथील चेंगराचेंगरीमध्ये जीव गमावलेल्या सर्व १२१ लोकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे, असे तेथील जिल्हाधिकारी आशिषकुमार यांनी गुरुवारी सांगितले. हे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

राहुल गांधी आज हाथरसला भेट देणारलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे शुक्रवारी दौरा करणार आहेत. ही माहिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी तिरुवअनंतपुरम येथे गुरुवारी दिली. हाथरस येथील सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा बळी गेला होता. ही अतिशय दुर्दैवी घटना होती, असेही ते म्हणाले. हाथरसमधील दुर्घटनेत जखमी झालेले लोक, मृतांचे नातेवाईक यांच्याशी राहुल गांधी संवाद साधतील. 

टॅग्स :Policeपोलिस