शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

"समान नागरी कायदा अमान्य", मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डनं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:56 AM

मौलाना खालिद यांनी म्हटलं की, भारताचं संविधान हे प्रत्येक नागरिकास स्वत:च्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा अधिकार देते

नवी दिल्ली - समान नागरी कायद्याची (Uniform Civil Code) मागणी झपाट्याने वाढत आहे. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसह भाजपशासित राज्यांनी एकसमान धोरण तयार करण्याच्या त्यांच्या योजनांवर काम सुरू केले. त्याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने समान नागरी कायदा असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. या कायद्याला देशातील मुस्लीम नागरिक स्वीकार करणार नाहीत. त्यामुळे, केंद्र सरकारने असे कुठलेही पाऊल उचलू नये, असा आग्रह पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी यांनी केली आहे.  

मौलाना खालिद यांनी म्हटलं की, भारताचं संविधान हे प्रत्येक नागरिकास स्वत:च्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा अधिकार देते, हा मौलिक अधिकार आहे. या अधिकारामुळेच अल्पसंख्यांक आणि आदिवासींना त्यांच्या रुढी-परंपरा, चालीरिती, आस्था यांनुसार वेगळ्या पर्सनल लॉची परवानी आहे. पर्सनल लॉ कुठल्याही प्रकारे संविधानात हस्तक्षेप करत नाही, असेही खालिद यांनी म्हटले आहे. याउलट, अपल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक समुदायांमध्ये एक विश्वास टिकवून ठेवण्याचं काम पर्सनल लॉद्वारे होते, असेही खालिद यांनी म्हटले.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, समान नागरी कायदा तयार करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल आणि राज्यातील जातीय सलोखा कोणत्याही किंमतीत बिघडू दिला जाणार नाही. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर इतर राज्यांनीही त्याचे पालन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. उत्तराखंड व्यतिरिक्त, उत्तर प्रदेश देखील समान नागरी कायदा लागू करण्याच्या योजनेचा पाठपुरावा करत आहे, तर इतर काही राज्यांच्या नेत्यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. 

काय म्हणाले अमित शहा

भोपाळमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी समान नागरी कायद्यासंदर्भात भाष्य केलं. देशात सीएए, राम मंदिर (Ram Temple), कलम ३७० आणि ट्रिपल तलाक यांसारख्या मुद्द्यांवर निर्णय झालाय. आता समान नागरी कायद्याची वेळ आलीय. याआधी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना विचारलं की, देशात सर्वकाही ठीक झालं काय? यानंतर त्यांनी समान नागरी कायद्याची चर्चा केली.

राज ठाकरेंनीही केली मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या गुढी पाडवा मेळाव्याच्या सभेतील भाषणात 'समान नागरी कायद्याचं' समर्थन केलं आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशात समान नागरी कायदा लागू करावा.' लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी कायदा आणला पाहिजे, असे राज यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं.  

टॅग्स :Muslimमुस्लीमAmit Shahअमित शाहRaj Thackerayराज ठाकरेUttarakhandउत्तराखंड