शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

जम्मू-काश्मीरची परिस्थिती बदलतेय; सैनिकांवरील दगडफेकीच्या घटनांमध्ये 99% घट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 5:30 PM

सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी झाले.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी जवानांवर होणारे हल्ले, दगडफेक आणि घुसखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, दगडफेकीच्या घटना जवळजवळ पूर्णपणे संपल्या आहेत. यावरुन जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट होते. 

सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्के कमी मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षा दलांमधील घातपात, म्हणजेच सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी झाले आहे. या वर्षी जी-20 बैठकही श्रीनगरमध्ये झाली. केंद्रीय गृह मंत्रालय जम्मू आणि काश्मीरवर लक्ष ठेवून आहे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नियमित अंतराने बैठका सुरू असतात. 

दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घटआकडेवारीनुसार, 2020 च्या पहिल्या सहा महिन्यांत, स्थानिक अधिकाऱ्यांनी दगडफेकीच्या एकूण 324 घटनांची नोंद केली. पुढच्या वर्षी अशा घटना 179 पर्यंत खाली आल्या. 2022 आणि 2023 मध्ये याच कालावधीत एकूण 50 आणि 3 घटनांची नोंद झाली आहे. 2020 पासून जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे, हा आकडा 32 वरून 11 वर आला आहे.

स्फोटकांच्या जप्तीमध्ये मोठी घटजम्मू-काश्मीरमधून स्फोटके आणि ग्रेनेड्सच्या जप्तीतही घट झाली आहे. 2021 मध्ये सुरक्षा दलांनी सुमारे 68 किलो स्फोटके जप्त केली. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ही संख्या शून्य आहे. 2020 मधील 266 वरून 2023 मध्ये ग्रेनेड जप्तीचे प्रमाण 83 पर्यंत कमी झाले आहे. शस्त्रास्त्रांचा साठाही 246 वरून 73 वर आला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद