शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

रेल्वेचा वेग हाेणार ताशी २२० किमी! वंदे भारतही पडणार मागे, ५९ किलाेमीटरचा टेस्टिंग ट्रॅक हाेताेय तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 7:18 AM

भारतात वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वांत वेगवान रेल्वे विविध मार्गांवर सुरू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :

भारतात वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वांत वेगवान रेल्वे विविध मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. आता वंदे भारतपेक्षा जास्त वेगाने रेल्वे चालविण्याची तयारी भारतीय रेल्वेने सुरू केली आहे. या गाड्या ताशी २२० किमी एवढ्या वेगाने चालविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी राजस्थानमध्ये टेस्टिंग ट्रॅक विकसित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यावर सध्याच्या राेलिंग स्टाॅकचीही चाचणी शक्य हाेणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अशी सुविधा असलेला भारत पहिलाच देश ठरणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १८० किलाेमीटर एवढ्या वेगाने चाचणीदरम्यान धावली हाेती. ही गाडी सेमी हायस्पीड या श्रेणीमध्ये येते. भविष्यात ताशी २२० किमी वेगाने रेल्वे चालविण्याची याेजना आहे. 

असा असेल ट्रॅक२३ किमीचा हाय स्पीड मेन ट्रॅक राहणार आहे.१३ किमी हायस्पीड लूप ट्रॅक गुढा येथे असेल.३ किमीचा जलद टेस्टिंग लूप नवा येथे राहणार आहे.२० किमीचा कर्व्ह टेस्टिंग लूप उभारण्यात येईल.

या गाड्यांच्या चाचणीसाठी जाेधपूर विभागात गुढा-थथना मीठडी या दरम्यान ५९ किलाेमीटरचा टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. त्याचा पहिला टप्पा यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण हाेणार असून, २०२४ च्या अखेरपर्यंत दुसरा टप्पादेखील पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

अशी हाेईल चाचणी- या टेस्ट ट्रॅकवर रेल्वे धावताना सर्व सुरक्षेचे मापदंड तपासण्यात येतील. त्यात स्टॅबिलिटी, व्हील ऑफलाेडिंग, ट्रॅक ओव्हरहेड इक्विपमेंट तसेच सिग्नलिंग यंत्रणांचा समावेश राहील. 

राेलिंग स्टाॅक म्हणजे काय?रेल्वेमध्ये नियमितपणे वापरण्यात येत असलेले काेच तसेच डब्यांना राेलिंग स्टाॅक म्हटले जाते. प्रवासी आणि माल गाडीचे डबे याचाच भाग आहेत. हाय स्पीड ट्रॅकवर यांचीही चाचणी रेल्वे करणार आहे.

भारतीय रेल्वेकडून येणाऱ्या काळात ॲल्युमिनियमचा वापर करून १०० ‘वंदे भारत’ची निर्मिती केली जाणार आहे. सध्या स्टेनलेस स्टीलपासून रेल्वे बनविण्यात येतात. ॲल्युमिनियमच्या गाड्या वजनाने हलक्या राहतात. त्या सहज ताशी २०० किमी वेगाने धावू शकतात.

ताशी २२० किमी वेगाने चाचणी पुरेसी नाही. सर्वप्रथम मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा यासारख्या प्रमुख मार्गांवर ट्रॅक अपग्रेड करण्याची गरज आहे.    - सुधांशू मणि, रचनाकार, वंदे भारत एक्स्प्रेस