शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

‘भरपूर मुलं जन्माला घाला, घर मोदी देतील’, दोन पत्नी, आठ मुले असलेल्या मंत्र्याचं विधान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 2:49 PM

Rajasthan News: राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकारची स्थापना होऊन महिनाही उलटत नाही तोच येथील आमदार आणि मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करून नवनव्या वादांना तोंड फोडण्यास सुरुवात केली आहे.

राजस्थानमध्येभाजपाची सत्ता आल्यानंतर भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकारची स्थापना होऊन महिनाही उलटत नाही तोच येथील आमदार आणि मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करून नवनव्या वादांना तोंड फोडण्यास सुरुवात केली आहे. आचार्य बालमुकुंद यांच्या विधानानंतर आता मंत्री बाबूलाल खराडी यांचं एक विधान चर्चेत आहेत. खराडी यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बोलताना  लोकांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी हे विधान गमतीचा भाग म्हणून केलं होतं. हेच विधान आता चर्चेत आहे.

आदिवासी विकास मंत्री खराडी यांनी जिल्ह्यातील नाई गावामध्ये विकसित भारत संपर्क यात्रेंतर्गत आयोजित एका कार्यक्रमामध्ये हे विधान केलं. ते म्हणाले की, तुम्ही भरपूर मुलांना जन्माला घाला. अडचण कुठली आहे? कुणी उपाशी आणि बेघर राहणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे स्वत: खराडी यांच्या दोन पत्नी आणि आठ मुले आहेत. त्यात चार मुलगे आणि चार मुलींचा समावेश आहे. या भागात बहुविवाह प्रथा अजूनही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला घर बांधून देतील, असं विधान त्यांनी करताच उपस्थितांनी खो खो हसायला सुरुवात केली. खराडी यांनी हे विधान केलं तेव्हा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेही मंचावर उपस्थित होते. झाडोल विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेले आणि पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या बाबूलाल खराडी यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.   

टॅग्स :Rajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा