शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

मुंबईतील १९९२-९३च्या दंगलीत कायदा-सुव्यवस्था राखण्यात तत्कालीन सरकार अपयशी- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 6:32 AM

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जनतेच्या हक्कांची जपणूक करण्याची हमी राज्यघटनेच्या २१ व्या कलमात देण्यात आलेली आहे.

नवी दिल्ली : बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर १९९२-९३ साली मुंबईत जातीय दंगल उसळली होती. ही दंगल रोखण्यात आलेले अपयश व त्यावेळी ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत सर्वोच्च न्यायालयाने त्या घटनेनंतर सुमारे तीस वर्षांनी महाराष्ट्रातील तत्कालीन राज्य सरकारला दोषी ठरवले आहे. तसेच या दंगलीची झळ पोहोचलेल्या कुटुंबांना भरपाई द्यावी तसेच त्यावेळच्या बासनात पडून असलेल्या गुन्हे प्रकऱणांचा पुन्हा तपास करावा, असा महत्त्वपूर्ण आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, जनतेच्या हक्कांची जपणूक करण्याची हमी राज्यघटनेच्या २१ व्या कलमात देण्यात आलेली आहे. राज्य सरकारकडे कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. मात्र, त्या गोष्टीत महाराष्ट्रातल्या तत्कालीन राज्य सरकारला अपयश आले, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. दंगलीत मरण पावलेल्या ९०० जणांच्या तसेच ६० बेपत्ता लोकांच्या वारसदारांना २ लाख रुपये भरपाई देण्यात आली. उर्वरित १०० बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना शोधून त्यांनाही भरपाई द्या, असे काेर्ट म्हणाले.

पीडितांना भरपाई द्या-

मुंबईतील १९९२-९३च्या जातीय दंगलीत मरण पावलेल्या ९०० जणांच्या तसेच ६० बेपत्ता लोकांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये भरपाई देण्यात आली. या महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीची सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेतली. या दंगलीत १६० जण बेपत्ता झाले होते. पण प्रत्यक्षात ६० जणांच्या वारसदारांना भरपाई देणे शक्य झाले, असेही राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले. त्यावर उर्वरित १०० बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना शोधून त्यांनाही भरपाई देण्यासाठी पावले उचलावीत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

देखरेखीसाठी समिती

न्यायालयाच्या आदेशाचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्र