शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

Yogi Cabinat Minister Numbers: एका राज्यात नेमके किती मंत्री असू शकतात? जाणून घ्या यूपीत योगींनी कसा फिट केला कॅबिनेटचा फॉर्म्यूला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:47 IST

Yogi Cabinat Minister Numbers: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज इतिहास रचला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Yogi Cabinat Minister Numbers: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज इतिहास रचला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुसरीकडे सिरथूमधून निवडणूकीत पराभूत होऊनही केशवप्रसाद मौर्य यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर ब्रजेश पाठक यांनाही ब्राह्मण चेहरा म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एकूण ५२ मंत्री असणार आहेत. यात जुन्या मंत्रिमंडळातील अनेक प्रमुख चेहऱ्यांसह नव्या चेहऱ्यांनाही यावेळी स्थान देण्यात आले आहे.

सीएम योगी आणि केंद्रीय नेतृत्वाची इच्छा असेल तर उत्तर प्रदेशात ५२ पेक्षा जास्त मंत्री केले जाऊ शकतात. पण, काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल केले जाऊ शकतात. त्यानंतर सामाजिक जडणघडण आणि जातीय समीकरणाच्या आधारे आणखी काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त किती मंत्री असू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? किंवा कोणत्या राज्यात किती मंत्री केले जाऊ शकतात? हे जाणून घेऊयात. 

कॅबिनेट फॉर्म्युला काय?केंद्र असो की राज्य, मंत्रिमंडळात जास्तीत जास्त मंत्र्यांची संख्या मर्यादित असते. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या १५ टक्के असू शकते. त्याचप्रमाणे राज्याच्या बाबतीतही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्के इतकेच मंत्री करता येतात.

उत्तर प्रदेशचं समीकरण काय?उत्तर प्रदेशबद्दल बोलायचं झालं तर विधानसभेच्या एकूण ४०३ जागांवर निवडणूक होते, तर एक आमदार राज्यपाल सरकारच्या संमतीनं नामनिर्देशीत करतात. हा आमदार निवडणूक लढवत नाहीत आणि त्यांचा कोणताही मतदारसंघ नसतो. म्हणजेच अशा प्रकारे विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या ४०४ होते. आता ४०४ जागांसाठी १५ टक्के (४०४ x १५ / १००) हा फॉर्म्युला लागू केला, तर 60.6 असं उत्तर येतं. म्हणजे उत्तर प्रदेशात ६० ते ६१ मंत्री केले जाऊ शकतात. म्हणजेच सीएम योगींच्या मंत्रिमंडळात ५२ मंत्री आणि एक मुख्यमंत्री शपथ घेत असतील, तरीही यात नंतर ७ किंवा ८ मंत्र्यांची वाढ करण्यास वाव आहे.

केंद्रशासित प्रदेशांसाठी काय नियम आहेत?देशात दिल्ली आणि पुद्दुचेरी सारखे केंद्रशासित प्रदेश देखील आहेत, ज्यांची स्वतःची विधानसभा आहे. अशा राज्यांमध्ये जास्तीत जास्त मंत्र्यांसाठी वेगळा नियम आहे. या केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियमांच्या आधारे मंत्रिमंडळ बनवलं जातं आणि मंत्री केले जातात. केंद्रशासित प्रदेशांमध्ये १५ टक्क्यांऐवजी १० टक्के फॉर्म्युला लागू होतो. दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळात फक्त ७ मंत्री आहेत. पुद्दुचेरीमध्येही हाच नियम लागू आहे.

अनेक वादही झाले आहेतमंत्रिमंडळातील जास्तीत जास्त मंत्र्यांच्या संस्खेवरुन वादही झाले आहेत. सहा वर्षांपूर्वी हरियाणा सरकारनं तीन नव्या मंत्र्यांचा समावेश केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हे प्रकरण दशांशावर गेल्यानं गोंधळ झाला. हरियाणामध्ये १५ टक्के फॉम्युल्यानुसार १३.५ असं उत्तर येतं आणि यावरूनच वाद झाला होता. केजरीवाल सरकारनं अनेक आमदारांना मुख्यमंत्र्यांचा सल्लागार बनवलं होतं. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळू शकतो. त्यावरही आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्या आधी शीला दीक्षित यांनीही आपल्या काही आमदारांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Electionनिवडणूक