शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संगमावरील पाणी अल्कलाईन एवढे शुद्ध; प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:03 IST

संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एनजीटीला अहवाल सोपविला होता, महाकुंभमधील संगमावरच्या पाण्यात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया सापडल्याचे यात म्हटले होते. यामुळे हे पाणी अंघोळीसाठी किंवा पिण्यासाठी लायक नसल्याचे म्हटले होते. या गंगाजलाच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना आता पद्मश्री डॉ. अजय सोनकर यांनी गंगाजलाचे परीक्षण केले आहे. यामध्ये गंगाजल अंघोळ करण्यासच योग्य नाही तर अल्कलाईन पाण्याएवढे शुद्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

संगम, अरैलसह पाच घाटांवरील पाण्याचे नमुने टेस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ५७ कोटी लोक अंघोळ करून गेले तरी या पाण्याच्या शुद्धतेत काही फरक पडला नसल्याचे ते म्हणाले आहेत. सोनकर यांनी त्यांच्या नैनी येथील लॅबमध्ये हे परीक्षण केले आहे. या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत येऊन टेस्टिंग करण्याचे आव्हानही दिले आहे. 

तीन महिन्यांच्या सतत संशोधनातून गंगेचे पाणी सर्वात शुद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. येथे आंघोळ केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही. बॅक्टेरियोफेज (जीवाणू खाणारा) असल्यामुळे गंगेच्या पाण्याची शुद्धता अबाधित राहते, असा दावा त्यांनी केला आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत १४ तास ठराविक तापमानावर ठेवल्यानंतरही त्यात विषाणूंची वाढ झालेली नाही. गंगाजल केवळ आंघोळीसाठी सुरक्षित नाही, तर त्याच्या संपर्कात आल्याने त्वचेचे आजारही होत नाहीत, असे ते म्हणाले. 

कोट्यवधी भाविकांनी स्नान केले असूनही, पाण्यात बॅक्टेरियाची वाढ झाली नाही किंवा पाण्याच्या पीएच पातळीत कोणतीही घट झाली नाही, असे यात दिसले आहे. गंगेच्या पाण्यात ११०० प्रकारचे बॅक्टेरियोफेज असतात. जे कोणत्याही हानिकारक जीवाणूंचा नाश करतात. यामुळे हे पाणी प्रदुषित झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. गंगेच्या पाण्याची आम्लता (पीएच) सामान्यपेक्षा चांगली होती आणि त्यात कोणताही दुर्गंधी किंवा बॅक्टेरियाची वाढ आढळली नाही. पीएच पातळी देखील ८.४ ते ८.६ दरम्यान आढळून आल्याचे ते म्हणाले. 

सोनकर हे प्रयागराजच्या नैनीचे राहणारे आहेत. कृत्रिमरित्या मोती वाढवून त्यांनी मोठी क्रांती केली होती. यामुळे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. 

 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाPrayagrajप्रयागराजwater pollutionजल प्रदूषण