शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

....तर हिंदू धर्म स्वीकारेन, मुस्लिम महिलेची धमकी

By admin | Published: April 13, 2017 10:08 AM

पतीसहीत सासरची मंडळी घरात प्रवेश देत नसल्याने संतापलेल्या एका मुस्लिम महिलेनं त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
अलीगड, दि. 13 - पतीसहीत सासरची मंडळी घरात प्रवेश देत नसल्याने संतापलेल्या एका मुस्लिम महिलेनं त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. बुलंदशहर येथे राहणारी रिहाना (30) हिचा निकाह 2012 मध्ये जमालपूर येथील मोहम्मद शरीफसोबत झाला होता. काही महिन्यानंतर पतीसोबत सतत वाद होऊ लागल्यानं रिहाना आपल्या 4 वर्षांच्या मुलीसह माहेर निघून गेली. 
 
यानंतर मंगळवारी ती पुन्हा सासरी परतली, तेव्हा सासरची मंडळी तिला घरात घेतच नव्हते. यामुळे तिनं घराच्या दारातच ठाण मांडला. यानंतर बुधवारी हिंदू महासभेचे काही स्थानिक नेते तिच्या मदतीसाठी जमालपूर येथे दाखल झाले. यामुळे या परिसरात आणखी तणाव निर्माण झाला. दरम्यान, हे प्रकरण ट्रिपल तलाकचं नसल्याचे रिहानाने स्पष्ट केले आगे.  
 
दीड वर्षात ट्रिपल तलाक प्रथा बंद?
तर दुसरीकडे, अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड येत्या 18 महिन्यांत ट्रिपल तलाकची प्रथा बंद करणार आहे, त्यामुळे सरकारला यात हस्तक्षेप करावा लागणार नाही, असे लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष कलबे सादिक यांननी स्पष्ट केले आहे. याचे भारतीय मुस्लिम महिला आंदोलनानं स्वागत केले आहे. पण यासाठी 18 महिन्यांचा कालावधी का हवाय, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. 
 
ट्रिपल तलाक 
कुराणामुसार आधी तलाक दिल्यानंतर व्यक्तीला आपल्या या निर्णयावर विचार करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात येतो. यानंतरही जर तो आपल्या निर्णयावर कायम असेल तर अजून दोन वेळा तलाक बोलल्यास तलाक दिला असं मानलं जातं. अनेक इस्लामिक देशांमध्ये ही परंपरा बंद करण्यात आली आहे. मात्र भारतात अद्यापही या प्रथेचं पालन केलं जातं.
 
ट्रिपल तलाक प्रकरण खंडपीठाकडे, 11 मेपासून सुनावणी

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ट्रिपल तलाक प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाने आज पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवली. सर्वोच्च न्यायालयाचेसरन्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठासमोर तिहेरी तलाकप्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी हा निर्णय सुनावला.

 

ट्रिपल तलाक प्रकरणी फक्त कायदेशीर मुद्द्यावरच सुनावणी होईल. सर्व पक्षकारांची बाजू न्यायालय विचारात घेईल. ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला प्रकरणी येणाऱ्या याचिकांवर खंडपीठाकडे सुनावणी होईल. ही सुनावणी 11 मेपासून घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश खेहर यांच्या खंडपीठाने सांगितले.

 

हत्या होण्यापेक्षा, तीन शब्द बरे...

वैयक्तिक कायदे हे घटनेचे उल्लंघन करणारे आहेत असे म्हणून त्यांना आव्हान देता येत नाही. जेव्हा वैवाहिक संबंधांत बेबनाव निर्माण होतो आणि पतीला पत्नीपासून विभक्त व्हावे वाटू लागते, तेव्हा वेळखाऊ न्यायालयीन प्रक्रियेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि पती विभक्त होण्यासाठी पत्नीची हत्याही करू शकतो. अशा स्थितीत तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार करून पत्नीला तलाक देणे हा उत्तम मार्ग आहे, असे या मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.