शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

...तर देशाची पुन्हा फाळणी होईल

By admin | Published: June 13, 2015 1:59 AM

: हिंदूराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ देणे म्हणजे भारताच्या आणखी एका फाळणीला खतपाणी घालण्यासारखे असल्याचे मत जेष्ठ

मडगाव (गोवा) : हिंदूराष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ देणे म्हणजे भारताच्या आणखी एका फाळणीला खतपाणी घालण्यासारखे असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी येथे बोलताना व्यक्त केले. ‘एका नास्तिकाचो देवारो’ या कोकणी पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.भारतातील काही लोक हिंदूराष्ट्र निर्मितीची भाषा करतात. भारत हे निधर्मी राष्ट्र आहे. भारतातील विचारवंतांनी जगाला वेगळ््या तत्वज्ञानाची ओळख करून दिली, या थोर राष्ट्रात धर्माच्या नावावर राष्ट्र निर्मितीची संकल्पना मांडणाऱ्यांना देशाची फाळणी करण्याची खुमखुमी लागली असल्याचा टोला मनोहर यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांनी स्वार्थासाठी पीडित, महिला, दलितांना देवाची भीती दाखवत त्यांच्या वैचारिकतेवर लगाम घातल्यामुळे लोक या बंधनातून मुक्त होत नाहीत. जो माणूस देवावर श्रद्धा ठेऊन स्वत:चे विचार गहाण ठेवतो, त्याच्या बुद्धीचा विकास होत नसल्याचे मनोहर म्हणाले.जेव्हा माणसाला ईश्वराची कल्पना नव्हती तेव्हा त्यांच्यामध्ये विचार करण्याची शक्ती होती. माणूस स्वत:च्या जीवनाचा मार्ग स्वत:च शोधत होता. जेव्हा माणसाला ईश्वराची कल्पना जाणवली तेव्हा त्यांच्यात पराधिनतेची, परावलंबनाची शक्ती एकवटली व विचार करण्याची सवय नष्ट झाली. आपल्या सर्व दु:खांचा, समस्यांचा ठेका देवावर टाकून माणूस मोकळा झाला. तेच त्याच्या विनाशाचे प्रमुख कारण ठरल्याचे मनोहर म्हणाले.लेखक दत्ता नायक स्वत: नास्तिक असून त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून वैचारिकतेची कास धरल्याचे त्यांनी सांगितले. दिवंगत माधवी सरदेसाई यांच्याकडून पुस्तकाची संकल्पना मिळाल्याचे नायक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)