शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

Prashant Kishor : "...तर मी पराभव स्वीकारेन"; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी केली मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:52 IST

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच स्वत:बाबत एक मोठी भविष्यवाणी केली आहे. २०२५ ची विधानसभा निवडणूक ते मोठ्या उत्साहाने लढवणार आहेत पण त्याआधी त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, जर जन सुराजला १३० किंवा १४० जागा मिळाल्या तर ते त्याला आपला पराभव मानतील.

जन सुराजच्या एका अकाऊंटवरून मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. प्रश्नांचं उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले की, "मी सांगतोय की, मला १३०-१४० जागा मिळाल्या तर मी तो मोठा पराभव मानेन. मी माझ्या आयुष्यातील हा मोठा पराभव मानेन की तीन वर्ष, माझ्या आयुष्यातील सर्व काही, मी माझा अनुभव, माझे प्रयत्न, माझं जीवन पणाला लावलं आहे आणि जर मला १३० जागा मिळाल्या तर मी तो जन सुराजचा पराभव समजेन."

लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोघांनी बिहारचं नुकसान केलं आहे. भाजपा आणि काँग्रेसने या दोघांपेक्षा जास्त बर्बाद केलं आहे. कारण लालू प्रसाद यादव हे स्वबळावर एकदाच बिहार जिंकले हे लोकांना माहीत नाही. नितीश कुमार यांनी आजपर्यंत स्वबळावर बिहार जिंकलेला नाही. या दोन्ही गोष्टी जनतेवर लादण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. काही खासदारांच्या लालसेपोटी काँग्रेसने लालूंना बिहार विकला."

"आज भाजपाही तेच करत आहे. बिहारची जनता नितीश यांच्या हाती गेली आहे" असंही प्रशांत किशोर यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. प्रशांत किशोर गेल्या दोन वर्षांपासून पदयात्रा करत आहेत. जन सुराज पक्षाची २ ऑक्टोबरला स्थापना होणार असून हा पक्ष बिहारमध्ये २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. बिहारमधील लोकांना बदल हवा आहे आणि त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असा दावा प्रशांत किशोर सातत्याने करत आहेत.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहारElectionनिवडणूक 2024Nitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव