शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

... तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप होईल, योगी सरकारबद्दल भाजपा आमदारच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:23 IST

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजात आमदारांची काहीच भूमिका नाही. आमदारांच्या सूचनांकडे कुणीही लक्ष देत नाही. राठौर हे सितापूरचे आमदार आहेत

ठळक मुद्देराठौर यांनी यापूर्वीही उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. गतवर्षी एप्रिल महिन्यात कथितप्रकरणात त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार राकेश राठौर आपल्या पक्षाच्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोरोना परिस्थितीवरुन उत्तर प्रदेश सरकारवर त्यांनी टीका केलीय. तसेच, अधिक बोलायला आपण घाबरतो, कारण त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशा शब्दात उत्तर प्रदेशातील आमदाराने राज्य सरकारवरच्या दडपशाहीबद्दल भावना व्यक्त केली आहे. 

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजात आमदारांची काहीच भूमिका नाही. आमदारांच्या सूचनांकडे कुणीही लक्ष देत नाही. राठौर हे सितापूरचे आमदार आहेत. मी अनेकदा आवाज उठवला आहे, पण आमदारांची लायकी काय, मी जास्त बोललो तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावला जाऊ शकतो. सितापूरमधील एका सरकारी रुग्णालयातील ट्रामा सेंटरबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राठौर यांनी योगी सरकारवरच टीका केली. 

राठौर यांनी यापूर्वीही उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्पष्टपणे आपली भूमिका मांडली होती. गतवर्षी एप्रिल महिन्यात कथितप्रकरणात त्यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यानंतर, भाजपाने त्यांना नोटीस बजावली होती. टाळी वाजवून कोरोना पळवून लावता येईल का? शंख वाजवून कोरोना पळून जाईल का? आपण मूर्खपणाचे रेकॉर्ड तोडत आहोत. आपल्यासारखे लोकं मूर्ख आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टाळी वाजविण्याच्या आवाहनावर राठौर यांनी प्रतिक्रिया दिली होती. 

आरोग्य व्यवस्था रामभरोसे

अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने योगी सरकारला धारेवर धरले. न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला पाच सूचना केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे सांगत योगी सरकारला फटकारले.

उच्च न्यायालयाने केल्या ५ सूचना 

अलाहाबाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला कोरोनाच्या परिस्थितीत लढण्यासाठी ५ सूचनावजा सल्ले दिले आहेत. एक म्हणजे बड्या औद्योगिक घराण्यांकडून करण्यात येणाऱ्या दानाची रक्कम वा फंड कोरोनाची लस खरेदीसाठी वापरावा. दुसरे म्हणजे बीएचयू वाराणसीसह गोरखपूर, प्रयागराज, आग्रा, मेरठ येथील ४ मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधा वाढवाव्यात. २२ मेपर्यंत याचा अपग्रेडेशन प्लान न्यायालयाला सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारyogi adityanathयोगी आदित्यनाथGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या