ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. ११ - टिपू सुलतनान मुसलमानऐवजी हिंदू असते तर त्यांनाही महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांप्रमाणेच दर्जा देण्यात आला असता असे मत ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांनी मांडले आहे. बेंगळुरुतील विमानतळाला टिपू सुलतान यांचे नाव द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कर्नाटकमध्ये टिपू सुलतान यांच्या जयंतीवरुन वाद सुरु असून कर्नाटक सरकारने जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हिंदूत्ववादी संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे. मंगळवारी विरोध प्रदर्शनादरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण आणखी चिघळले आहे. आता या वादात ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांनीही उडी मारली आहे. बेंगळुरुतील सचिवालयात टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश कर्नाड म्हणाले, टिपू सुलतान यांच्या धर्मामुळे त्यांना अपेक्षित मानसन्मान मिळाला नाही. हल्ली शिकलेली लोकं आणि नेते व्यक्तीची जात व धर्म पहिले बघतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.