शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"सरकार कोणाचं येईल हे सांगण्यासाठी लाल किल्ला नाही", काँग्रेसचा मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 16:30 IST

मोदींनी आपल्या भाषणात तीन कमिटमेंट सांगितल्या. त्यामध्ये परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणावर भाष्य करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला

नवी दिल्ली - आपल्या ९० मिनिटां भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले. तसेच, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख करत नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकीचीही बिजे रोवली. तर, पुढच्या वर्षीही १५ ऑगस्टला आपणच झेंडावंदन करू, असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याला विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. तर, मोदींच्या भाषणावर काँग्रेसच्या खर्गेंनी प्रतिक्रिया दिली. तसेच, माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांनीही मोदींच्या भाषणावर पलटवार केला आहे.

मोदींनी आपल्या भाषणात तीन कमिटमेंट सांगितल्या. त्यामध्ये परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणावर भाष्य करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तीस वर्षांनी देशाला बहुमताचे, ताकदवर सरकार हवे असे जनतेला वाटले होते. आज देशात तीन दशकांनी ताकदवर सरकार आले आहे. तेच देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकते, असेही मोदींनी यावेळी म्हटले. मोदींनी आपल्या भाषणात नाव न घेता काँग्रेसला लक्ष्य केलं. तसेच, घराणेशाही म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला. पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार येईल, असा विश्वासही अप्रत्यक्षपणे त्यांनी लाल किल्ल्यावरुन व्यक्त केला. त्यानंतर, मल्लिकार्जुन खर्गें आणि मीरा कुमार यांनी मोदींच्या भाषणावर पलटवार केला

''जे निवडणुकांमधून विजयी होतात, तेच तर राजकारणात असतात. त्यामुळे, घराणेशाही किंवा वंशवादाचा मुद्दा येतोच कुठे? असा थेट सवाल मीरा कुमार यांनी विचारला. तसेच, सरकार कोणाचं येतंय, कोणाचं नाही हे भाषण करण्यासाठी लाल किल्ल्याचं ऐतिहासिक स्थळ नाही. देशासाठी काय केलं पाहिजे आणि देश पुढे नेण्यासाठी काय करणार आहोत, यासंदर्भात पंतप्रधानांचं भाषण असायला हवं, असे म्हणत लोकसभेच्या माजी सभापती आणि काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर जोरदार टीका केली. 

ते स्वत:च्या घरी झेंडावंदन करतील

मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरही टीका केली. पुढच्यावर्षी पुन्हा एकदा आपणच झेंडा फडकवू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. त्यावर, पलटवार करताना खर्गेंनी मोदींना टोला लगावला. पुढच्यावर्षी १५ ऑगस्टला ते झेंडावंदन करतील, पण त्यांच्या घरी, असे म्हणत खर्गे यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. 

सुप्रिया सुळेंचाही पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर भाष्य केलं. मात्र, घराणेशाही तर आज प्रत्येक पक्षात आहे. मला गृहमंत्री अमित शहांचं संसदेतील भाषण आठवतं. जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे असतात, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर पलटवार केला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्लाcongressकाँग्रेसMeera Kumarमीरा कुमारMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे