शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
3
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
4
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
5
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
6
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
7
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
8
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
10
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
11
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
12
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
13
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
14
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
15
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
16
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
17
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
18
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
19
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
20
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!

प्रसिद्धी माध्यमांच्या कामात सरकारी हस्तक्षेप नको

By admin | Published: November 17, 2016 2:30 AM

प्रसिद्धी माध्यमांच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेप असू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे म्हटले. मात्र,

नवी दिल्ली : प्रसिद्धी माध्यमांच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेप असू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे म्हटले. मात्र, त्याचबरोबर बाह्य हस्तक्षेपाने गोष्टी बदलणार नसल्याचे सांगून, काळानुरूप स्वत:त बदल घडवून स्वयंनियमनाचा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला. पत्रकारांच्या अलीकडील हत्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘हे अत्यंत दु:खदायक असून, सत्य दडपून टाकण्याची सर्वात धोकादायक पद्धत आहे.’ बिहारमध्ये दोन पत्रकारांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टिप्पणी केली. प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाच्या (पीसीआय) सुवर्णजयंती सोहळ्यात ते बोलत होते. माध्यमांनी स्वयंनियमन अंगी बाणावे, या आपल्या सल्ल्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी महात्मा गांधींचे विचार उद्धृत केले. ‘अनियंत्रित लेखनाने अनेक समस्या निर्माण होतील, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. तथापि, त्यांनी हेदेखील म्हटले की, बाह्य हस्तक्षेप अनर्थ घडवून आणेल. माध्यमांना बाहेरून नियंत्रित करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. ‘सरकारने कोणताही हस्तक्षेप करायला नको. हे खरे आहे की, स्वयंनियमन सोपे नाही. आपण काळानुरूप कोणते उपयुक्त बदल करू शकतो, हे पाहणे ही पीसीआय आणि माध्यम व्यवसायाशी संबंधित इतर संस्थांची जबाबदारी आहे. बाह्य हस्तक्षेपाने गोष्टी बदलत नाहीत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी एखाद्या विशिष्ट बदलाचा उल्लेख केला नाही. तथापि, ते म्हणाले की, ‘जुन्या काळात पत्रकारांकडे सुधारणा करण्यासाठी पुरेसा वेळ असायचा. मात्र, वेगवान इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या युगात आता ही संधी नाही.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)