शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
2
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
3
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
4
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
5
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
6
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?
7
रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 
8
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
9
माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी
10
मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत
11
साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन
12
तिप्पट होऊ शकतो पैसा, Bajaj Housing Finance च्या शेअरला पहिलं 'बाय' रेटिंग; किती आहे टार्गेट प्राईज?
13
पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ 
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."
16
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
17
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
18
काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'
19
एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास
20
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी

दुष्काळामागे ग्रीन हाऊस गॅसेस नाही

By admin | Published: April 26, 2016 5:32 AM

हरितगृहातून उत्सर्जित वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) गोळा होऊन जगभरातील तापमानात वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : हरितगृहातून उत्सर्जित वायू (ग्रीन हाऊस गॅसेस) गोळा होऊन जगभरातील तापमानात वाढ झाली आहे. त्यापासून भारतही सुटलेला नाही, तथापि महाराष्ट्रासह देशभरातील भीषण तापमान, दुष्काळ आणि अतिवृष्टी हा त्याचा परिणाम नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली आहे.जागतिक तापमानात ०.६३ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाल्यामुळे देशभरातील बहुतांश भागातील तसेच सरासरी वार्षिक तापमान वाढले आहे. याउलट राजस्थान, गुजरात आणि बिहारच्या काही भागात तापमान किंचित घटलेही आहे. मुंबई, राजस्थान, उत्तराखंड आणि काश्मीरच्या काही भागात अतिवृष्टीचा बसलेला फटका अपवादात्मक म्हणता (स्थानविशेष) येईल. हवामान विभागाच्या अभ्यासानुसार त्याला भारतीय मान्सूनप्रणालीतील नैसर्गिक बदलाचा भाग मानले गेले. ताज्या अभ्यासात गेल्या ४० ते ५० वर्षांदरम्यान अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, मात्र वाढत्या जागतिक तापमानाशी त्याचा वैज्ञानिक आधारावर कोणताही संबंध असल्याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>केंद्र सरकारने विकास योजनांमध्ये पर्यावरणाला(इकॉलॉजी) सातत्याने प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जलवायू परिवर्तन कृतीयोजना(एनएपीसीसी) हाती घेतली असून त्या अनुषंगाने सर्व राज्यांनी कृती योजना आखली आहे. याशिवाय बाराव्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय अनुकुलन (अ‍ॅडाप्टेशन) निधीसाठी प्रारंभीची रक्कम म्हणून ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांच्या काळात प्राण आणि संपत्तीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.