शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पाकिस्तानशी काहीही संबंध ठेवण्याची गरज नाही - गौतम गंभीर

By admin | Published: October 18, 2016 6:02 PM

जोपर्यंत सीमारेषेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणताच संबंध ठेऊ नये असं परखड मत भारतीय फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारत - पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. चित्रपटांवर टाकण्यात आलेली बंदी हा चर्चेचा विषय असून पाकिस्तानसोबत भारताने संबंध ठेवावेत की नाही यावर प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करत आहे. भारतीय फलंदाज गौतम गंभीरनेही या मुद्यावर रोखठोक मत व्यक्त करत 'जोपर्यंत सीमारेषेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणताच संबंध ठेऊ नये,' असं म्हटलं आहे. 'सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांसोबत आपण उभं राहण्याची गरज असल्याचंही,' गौतम गंभीर बोलला आहे.
 
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीरने हे वक्तव्य केलं आहे. 'जोपर्यंत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत असं मला वाटतं. ज्यांनी जीव गमावला आहे त्यांच्याठिकाणी उभं राहून त्यांनी स्वत: ला पाहण्याची गरज आहे. क्रिकेट असो वा बॉलिवूड पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नयेत,' असं गौतम गंभीर बोलला आहे.
 
'हो मी एका एसी रुममध्ये बसून हे बोलू शकतो की क्रिकेटला राजकारणाशी जोडू नका, बॉलिवूडचं राजकारण करु नका, पण तुम्ही जर शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांना विचारलत तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल. त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या लोकांची सुरक्षा करत नाही, इतर गोष्टी बाजूला ठेवायला हव्यात. दहशतवाद संपत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं नातं ठेऊ नये या मतावर मी ठाम आहे,' असं गौतम गंभीरने सांगितलं आहे.