शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भारत-पाकिस्तान मालिकेचा प्रश्नच येत नाही - अनुराग ठाकूर

By admin | Published: October 04, 2016 4:37 PM

भारत पाकिस्तानमध्ये ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर भारत-पाक क्रिकेट मालिकेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी अत्यंत महत्वाचं विधान

ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 4 - भारत पाकिस्तानमध्ये ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभुमीवर भारत-पाक क्रिकेट मालिकेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे. याक्षणी तरी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका होण्याचा प्रश्नच येत नाही असं ठाकूर म्हणाले आहेत.
 
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, 'यावर्षी तरी  भारत- पाकिस्तानमध्ये  क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रश्नच येत नाही. सर्वात आधी मी एक भारतीय आहे, माझ्यासाठी पहिले माझा देश येतो, देशापेक्षा महत्वाचं काहीच नाही. भारत - पाकिस्तानदरम्यान क्रिकेट सामने होण्यासाठी दोन्ही देशांमध्ये योग्य वातावरण असणं गरजेचं आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत तर हा प्रश्नच उद्भवत नाही'  असं ठाकूर म्हणाले.
 
यावेळी, बोलताना ठाकुर यांनी पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांच्यावरही निशाणा साधला . भारताला ऑल आउट करा असं चिथावणीखोर विधान मियांदाद यांनी केलं होतं. त्यावर ज्यांचे कुख्यात दाऊद इब्राहीमसोबत संबंध आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते आपल्यासोबत कधी वर्ल्ड कपमध्येही जिंकू शकले नाहीत आणि झालेल्या प्रत्येक युद्धातही त्यांचा पराभव झाला असं म्हणत ठाकूर यांनी मियांदादला प्रत्युत्तर दिले.