शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

विनाशासाठी मतस्वातंत्र्य नाही

By admin | Published: March 21, 2016 3:42 AM

राज्यघटनेने विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे, देशाचा विनाश करण्याचा नाही, असा सूर रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून उमटला.

नवी दिल्ली : राज्यघटनेने विरोधी मत नोंदविण्याचा अधिकार दिलेला आहे, देशाचा विनाश करण्याचा नाही, असा सूर रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून उमटला. राष्ट्रवाद व अभिव्यक्ती स्वातंत्र्य एकत्र नांदू शकतात, तर ‘भारत माता की जय’ म्हणणे हा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही, अशी घोषणा देण्यात कुणालाही अडथळा वाटायला नको, असेही मत पक्षाने मांडले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी बोलताना ज्येष्ठ नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, ‘पक्षाची आज अशी अवस्था झाली आहे की, निवडणुकीत काही करण्याची आपली महत्त्वाकांक्षा पक्ष हरवून बसला आहे.’ जेटलींनी दावा केला की, ‘पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींत पक्षाची ताकद वाढेल. आसाममध्ये आमचे सरकार येईल, तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची दिशा बदलेल. राज्यसभेत अल्पमतात असलेला भाजपा या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवून या परिस्थितीला बदलू पाहत आहे. कारण, वरच्या सभागृहात जीएसटीसह काही महत्त्वाची विधेयके अडकली आहेत. दरम्यान, उत्तराखंडमधील सरकारवर आलेल्या संकटाबाबत बोलताना ते म्हणाले की, याचा दोष भाजपावर देऊ नका. तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. या बैठकीतील प्रस्तावात असा दावा करण्यात आला आहे की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे एक प्रगतिशील सरकार आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत भाष्य करताना म्हटले आहे की, अतिरेक्यांना संपवून जवानांनी यावर लक्ष केंद्रित केले की, कशा प्रकारे कमीतकमी नुकसान होईल. भारत-बांगलादेश भूमी करार आणि माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन कराराचा उल्लेखही यात सरकारच्या कौशल्याचा भाग म्हणून केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘विकास, विकास आणि विकास’ हेच आपल्या सरकारचे एकमेव उद्दिष्ट आहे. विरोधी पक्ष निरर्थक विषय पुढे आणून यावरून लक्ष हटवू पाहात आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना बळी न पडता, भाजपा कार्यकर्त्यांनी केवळ सरकारच्या विकासाच्या अ‍ॅजेंड्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत केल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन सरकारने केलेली भरीव कामगिरी लोकांपुढे मांडावी, असेही पंतप्रधानांनी सांगितल्याचे राजनाथ सिंग म्हणाले.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आम्हीही पूर्ण समर्थन करतो. घटनेने विरोधी मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, विनाशाचा नव्हे. जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या, पण यासाठी अल्पसंख्याकांवर आरोप लावणे चुकीचे ठरेल. याचे नेतृत्व डाव्या विचारांच्या लोकांनी केले होते. - अरुण जेटली