शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

यूपीएससीसह कुठेही पेपरफुटी झाली नाही; केंद्र सरकारचा राज्यसभेत निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 05:21 IST

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) आणि बँकिंग कर्मचारी निवड संस्था (आयबीपीएस) यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीची कोणतीही घटना समोर आलेली नाही, असे केंद्र सरकारतर्फे राज्यसभेत स्पष्ट करण्यात आले.

केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले, “अलीकडेच राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) ५ मे २०२४ रोजी नीट-यूजी परीक्षा ओएमआर (पेन आणि पेपर) पद्धतीने घेतली होती. त्यात कथित अनियमिततेची काही प्रकरणे समोर आली. पुनरावलोकनानंतर २२ जून २०२४ रोजी हे प्रकरण सर्वसमावेशक तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) सोपवण्यात आले.”

“गेल्या दोन वर्षांत केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ आणि बँकिंग कर्मचारी निवड संस्था यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या भरती परीक्षांमध्ये पेपर फुटल्याची एकही घटना घडलेली नाही,” असा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला.  सार्वजनिक परीक्षांमधील अनुचित मार्ग रोखण्यासाठी सरकारने सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांना प्रतिबंध) कायदा, २०२४ लागू केला आणि त्यानंतर या कायद्याअंतर्गत नियमही अधिसूचित केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग