शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

शेतकऱ्यांवरील लाठीमाराची होणार चौकशी; धरणे आंदोलन घेतले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 6:46 AM

चर्चेच्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा निघाला.

चंदीगड : नव्या कृषी कायद्याविरोधात हरियाणातील कर्नाल येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर २८ ऑगस्ट रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन मागे घेतले आहे. लाठीमारात मरण पावलेल्या सुशील काजल या शेतकऱ्याच्या कुटुंबातील दोघा व्यक्तींना जिल्हा प्रशासनामध्ये नोकरी देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले.

चर्चेच्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा निघाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात केेलेले धरणे आंदोलन मागे घेतले आहे. २८ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराची निवृत्त न्यायाधीशाच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या लाठीमार प्रकरणी आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांनी निभावलेल्या भूमिकेचीही चौकशी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आयुष सिन्हा हे रजेवर असतील.

नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या हरियाणातील शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांचा एकही कार्यक्रम राज्यात होऊ द्यायचा नाही, असा निर्धार केला होता. कर्नाल येथे २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर भाजप बैठकीसाठी कर्नाल येथे येणार होते. खट्टर यांचा निषेध करण्यासाठी शेतकरी बस्तरा टोलनाक्याजवळ जमा झाले. त्यावेळी त्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात एक शेतकरी मरण पावला व १० शेतकरी जखमी झाले होते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणा