शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Airports Monetization Plan: देशातील 25 विमानतळांचे होणार खाजगीकरण; जाणून घ्या, काय आहे सरकारची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 18:03 IST

Airports Monetization Plan: केंद्र सरकारच्या या योजनेची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली आहे. जवळपास 25 विमानतळांच्या खासगीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली : देशात वाढते लसीकरण आणि कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये घट झाल्यामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता 31 जानेवारी 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर स्थगिती घालण्यात आली आहे. दरम्यान, यात आता मोठी बातमी अशी आहे की, वार्षिक आधारावर देशात वाढत्या हवाई प्रवाशांच्या संख्येमुळे आणि विमान वाहतूक क्षेत्राला फायदेशीर करार करण्यासाठी सरकारने नवीन मोनेटायझेशन प्लॅन तयार केल आहे. या अंतर्गत येत्या तीन वर्षांत 25 विमानतळांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

काय आहे सरकारची योजना?केंद्र सरकारच्या या योजनेची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली आहे. जवळपास 25 विमानतळांच्या खासगीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, लिस्ट तयार करण्यासाठी, देशातील विमानतळांची निवड त्यांच्या वार्षिक वाहतूक ट्रेंडच्या आधारे करण्यात आली आहे. 0.4 मिलियन (चार लाख) पेक्षा जास्त प्रवाशांची वार्षिक वाहतूक असलेल्या सर्व विमानतळांची खाजगीकरणासाठी निवड करण्यात आली आहे, असे व्ही. के. सिंह यांनी सांगितले.

लिस्टमध्ये 'या' विमानतळांचा समावेश राज्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकारने मालमत्ता खासगीकरणासाठी सरकारच्या योजनांचा एक भाग म्हणून निवडलेली 25 विमानतळे नागपूर, वाराणसी, डेहराडून, त्रिची, इंदूर, चेन्नई, कालिकत, कोईम्बतूर, भुवनेश्वर आणि पाटणा येथील आहेत. याशिवाय मदुराई, तिरुपती, रांची, जोधपूर, रायपूर, राजमुंद्री, वडोदरा, अमृतसर, सुरत, हुबळी, इंफाळ, आगरतळा, उदयपूर, भोपाळ आणि विजयवाडा येथील विमानतळांचे खाजगीकरण करण्याची सरकारची योजना आहे.

सर्वात आधी 'या' विमानतळांचे खासगीकरणरिपोर्टनुसार, कालिकट, कोईम्बतूर, नागपूर, पाटणा, मदुराई, सुरत, रांची आणि जोधपूर विमानतळांचे 2022-23 या आर्थिक वर्षात खाजगीकरण केले जाईल. यानंतर, चेन्नई, विजयवाडा, तिरुपती, वडोदरा, भोपाळ आणि हुबळी विमानतळांवर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये खासगीकरण करण्यात येईल.  त्यानंतर 2025 पर्यंत इंफाळ, आगरतळा, उदयपूर, डेहराडून आणि राजामुंद्री विमानतळाचे खासगीकरण करण्याची तयारी करण्यात आली आहे.

133 विमानतळं तोट्यातदेशभरातील 136 पैकी 133 विमानतळ तोट्यात असल्याचे रिपोर्टनुसार सांगण्यात आले आहे. व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे 2020-21 मध्ये देशातील 136 पैकी 133 विमानतळांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतातील 136 विमानतळांच्या कमाईच्या आकडांवरून असे दिसून आले आहे की, 2020-21 मध्ये त्यांनी सामूहिकरित्या 2,882.74 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे, 2019-20 मध्ये 80.18 कोटी रुपये आणि 2018-19 मध्ये 465.91 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हे नुकसानापेक्षा खूपच जास्त आहे. 

टॅग्स :Airportविमानतळbusinessव्यवसाय