शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

...'या' कारणांमुळे पाकिस्तानला एकाकी पाडणे कठीण

By admin | Published: September 21, 2016 12:12 PM

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताकडून जोरदार कुटनितीक प्रयत्न सुरु झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताकडून जोरदार कूटनितीक प्रयत्न सुरु झाले आहेत. २००८ साली मुंबईवरील हल्ल्यानंतरही असेच प्रयत्न झाले होते. लष्करी पर्यायापेक्षा कूटनितीक पर्याय अधिक प्रभावी ठरेल असे काहीजणांचे मत आहे. पण त्यात अपेक्षेइतके यश मिळण्याची शक्यता कमी आहे. भारतावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अन्य देशांकडून तात्पुरता विरोध दर्शवला जातो पण नंतर सर्वकाही पूर्वीसारखे होते. मुंबई हल्ल्यानंतरही असेच झाले होते. पाकिस्तानला पूर्णपणे एकाकी पाडणे का शक्य नाही त्याची काही कारणे 
 
-  उरी दहशतवादी हल्ल्यानंतर काही देशांनी निषेधाचा संदेश प्रसिद्ध करताना स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख केला. अमेरिकेने काश्मीर खो-यावरील हल्ला म्हटले आहे स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख केलेला नाही. अमेरिकेप्रमाणेच काही महत्वाच्या देशांनी पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. 
 
- आज जगात अमेरिकेप्रमाणे चीनही एक महासत्ता आहे. चीनचा पाकिस्तानला भक्कम पाठिंबा आहे. त्यातुलनेत अमेरिकेचा आपल्याला तितका भक्कम पाठिंबा नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रामध्ये भारताकडून आणला जाणारा प्रस्ताव चीन आपल्या विशेषाधिकारा वापर करुन हाणून पाडतो. ही देखील भारताची एक मोठी अडचण आहे. 
 
- अमेरिका अनेक वर्ष भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवत आला आहे. भारताची बाजू अमेरिका उचलून धरते. पण त्यावर कारवाई करायला पाकिस्तानला भाग पाडत नाही. याचे मुख्य कारण आहे पाकिस्तानचे भौगोलिक स्थान. आजही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये आहे त्याचप्रमाणे अमेरिकेला असलेला दहशतवादाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. पाकिस्तान दहशतवादाचा अड्डा असला तरी, पाकिस्तानला दूर लोटून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पाकिस्तान विरोधातील दहशतवादाच्या मुद्यावर अमेरिका पूर्णपणे भारताची साथ देणार नाही. 
 
- पाकिस्तानला आज जगातील अनेक महत्वाच्या मुस्लिम देशांचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा तोडणे इतके सोपे नाही.