शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 21:17 IST

योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाली.

जर आपल्यात फूट पडली नसती, तर ना श्री राम मंदिर पडले असते, ना श्रीकृष्णजन्मभूमीवर गुलामगिरीचा 'ढाचा' तयार झाला असता. ना देशाला गुलाम व्हावे लागले असते. यामुळे मजबूत सरकार असणे आवश्यक आहे. हरियाणात भाजपचे सरकार आल्यानंतर राममंदिर आणि कृष्णजन्मभूमीला विरोध करणारे रस्त्यावर हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे राम, हरे राम करताना दिसतील, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते हरियाणातील फरीदाबाद येथे विधानसभा प्रचारादरम्या बोलत होते.

योगी म्हणाले, काँग्रेसने राम मंदिराचा वाद मिटू दिला नाही. जो वाद काँग्रेसला 65 वर्षात मिटवता आला नाही. तो 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कायमचा मिटला. आज देशात ज्या काही समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळेच देशाची फाळणी झाली.

गेल्या 10 वर्षांत डबल इंजिन सरकारने हरियाणाला विकास आणि सुशासनाचे मॉडेल दिले आहे. भारतीय जनता पक्ष असेल तर श्रद्धेचा आदर केला जातो, सुरक्षितता, रोजगार आणि गरीबांच्या कल्याणाची हमी असते, असेही योगी म्हणाले.

योगी म्हणाले, उत्तर प्रदेश हरियाणाला लागून आहे. सात वर्षांपूर्वी येथे काय परिस्थिती होती? रोज दंगल व्हायची. महिनाभर संचारबंदी चालायची. शेतकऱ्यांचे पीक तयार होत होते, पण कुणी दुसरेच त्याची कापणी करून घेऊन जात होते. मात्र, आपण बघितले असेल की, गेल्या सात वर्षांत तेथे एकही दंगल झाली नाही. डबल इंजिन सरकार जोरदार सुरू आहे. काँग्रेसने हरियाणात माफिया राजवट दिले आहे. माफिया राजवटीपासून मुक्ती हवी असेल तर भाजप हा एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथHaryanaहरयाणाUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस