शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Corona Vaccine: तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; कोरोनाविषयक कृतिगटाचा केंद्र सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 07:01 IST

कोरोना लसीचे दोन्ही डोस  घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो.

-हरीश गुप्तानवी दिल्ली : देशातील नागरिकांना कोरोना लसीचा तिसरा बूस्टर डोस देण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक कार्यगटाचे मत असून ते केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे. 

कोरोना लसीचे दोन्ही डोस  घेतले तरी कोणालाही पुन्हा हा आजार होऊ शकतो. मात्र त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू होण्याचा किंवा प्रकृती खूप गंभीर होण्याचा प्रकार टाळता येतो. कोरोना साथीबरील उपचारांबाबत धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारने हा कार्यगट स्थापन केला आहे. या कार्यगटाने केंद्र सरकारला कळविले आहे की, कोरोना लस घेतलेल्यांना तिसरा बूस्टर डोस द्यावा, असे मत जागतिक आरोग्य संघटना किंवा अन्य महत्त्वाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेले नाही. अमेरिका, ब्रिटनमध्ये तिसरा बूस्टर डोस देण्यात आला पण त्याचे काही खास परिणाम दिसून आले नाहीत.

जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेचे संचालक व कोरोना कार्यगटाचे सदस्य डॉ. राकेश अग्रवाल यांनी सांगितले की, नजीकच्या काळात जास्तीत जास्त लोकांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. या एकाच उपायाने मृत्यू व रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकेल.  पुन्हा कोरोना झालेल्यांपैकी ज्यांना एकाहून अधिक व्याधी नाहीत अशा लोकांच्या जीवाला तुलनेने कमी धोका असतो. अशा रुग्णांचा मृत्यू होणे किंवा त्यांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल करावे लागण्याची पाळी येण्याची शक्यता नसते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या