शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

तिसऱ्यांदा भूसंपादन वटहुकूम

By admin | Published: May 30, 2015 11:37 PM

केंद्रीय मंत्रिमंडळाने वादग्रस्त भूसंपादन वटहुकूम पुन्हा लागू करण्याची शिफारस शनिवारी केली. त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा या वटहुकमाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने वादग्रस्त भूसंपादन वटहुकूम पुन्हा लागू करण्याची शिफारस शनिवारी केली. त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यकाळात तिसऱ्यांदा या वटहुकमाचा मार्ग मोकळा झाला आहे. सातत्य कायम राखणे आणि ज्यांची जमीन संपादित केली जाते त्यांना मोबदला देण्यासाठी एक ठोस आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.२०१३ च्या भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भूसंपादन वटहुकूम आणण्यात आला होता. या वटहुकूमाऐवजी संबंधित विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरही राज्यसभेत संख्याबळाअभावी सरकारला ते मांडता आले नाही. यावर्षी मार्च महिन्यात दुसऱ्यांदा हा वटहुकूम लागू करण्यात आला असून, येत्या जून महिन्यात त्याची मुदत संपणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस मंजुरीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविण्यात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)भूसंपादनावर संसदीय संयुक्त समितीच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी २०१३ च्या भूसंपादन कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करण्याबाबत सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भूसंपादन विधेयक जीवन-मरणाचा प्रश्न नाही - मोदी४केंद्रीय मंत्रिमंडळाने भूसंपादन वटहुकूम तिसऱ्यांदा लागू करण्याचा निर्णय घेतला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक म्हणजे माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न नसून यासंदर्भात कुठल्याही सूचनांवर विचार करण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.ही तर न्यायाची खिल्ली - काँग्रेस४भूसंपादन वटहुकूम तिसऱ्यांदा लागू करण्याची शिफारस करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे ‘न्यायाची खिल्ली’आणि ‘संसदेचा अवमान’ असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.