शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:33 PM

Amit Shah : ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे, असे अमित शाह म्हणाले.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी निवडणुकीत होत आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जम्मू-काश्मीरमधील मेंढर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका. ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे. अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी ही तीन घराणं आहेत. या तिन्ही घराण्यांनी इथे लोकशाही थांबवली होती. जर, २०१४ मध्ये मोदींचे सरकार आले नसते तर पंचायत, ब्लॉक आणि जिल्हा निवडणुका झाल्या नसत्या, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, अमित शाह यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादासाठी या तीन कुटुंबांना जबाबदार धरले. ते म्हणाले, ९० च्या दशकात फारुख यांच्या मेहरबानीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आला. ९० च्या दशकात इथे मोठ्या प्रमाणात गोळीबार व्हायचा, कारण इथले सूत्रधार पाकिस्तानला घाबरत होते. पण आता पाकिस्तान नरेंद्र मोदींना घाबरत आहे. गोळीबार करण्याचे त्यांच्यात धाडस नाही. गोळीबार झाला तर गोळीबाराला गोळ्यांनी उत्तर दिले जाईल, असे अमित शाह म्हणाले. 

आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवला असून तरुणांच्या हातात दगडांऐवजी लॅपटॉप दिले आहेत. एक काळ असा होता की तरुणांची स्वप्ने पायदळी तुडवली जायची आणि आज अशी वेळ आली आहे जेव्हा मोदी सरकारच्या धोरणांमुळे अमृत पिढी जगामध्ये देशाचे नाव तर उंचावत आहेच, शिवाय एक महत्त्वाचे कार्य करत आहे. विकसित भारताच्या उभारणीत योगदान देत आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील लोकांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले, मोदी आल्यानंतर ओबीसी, मागासवर्गीय, गुर्जर बकरवाल आणि पहाडींना आरक्षण मिळाले. मी विधेयक मांडले तेव्हा फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाने त्याला विरोध केला आणि येथील त्यांनी गुर्जर बंधूंना भडकावण्यास सुरुवात केली. मी राजौरीला आलो तेव्हा गुर्जर बांधवांचे आरक्षण कमी करणार नाही, असे वचन दिले होते. तर आम्ही गुर्जर, बकरवाल आणि पहाडींनाही बढतीत आरक्षण देण्याचे सांगत आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा