शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

ही तर मनुस्मृतीविरुद्ध संविधानाची लढाई; राहुल गांधी यांचे लोकसभेत चर्चेवेळी कठोर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 05:31 IST

सावरकरांनी संविधानात कोणतीच बाब भारतीय नसल्याचे म्हटले होते. सावरकरांनी संविधानाच्या तुलनेत मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या एका भाष्याचा हवाला देत, भाजप तसेच केंद्र सरकारवर कठोर टीका केली. एकलव्याचा जसा अंगठा कापून घेतला गेला, तसेच देशातील युवकांचे अंगठे कापले जात आहेत, असे सांगून आज देशात 'संविधान विरुद्ध मनुस्मृती' अशी लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले.

संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवयात्रेवर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी दावा केला की, सावरकरांनी संविधानात कोणतीच बाब भारतीय नसल्याचे म्हटले होते. सावरकरांनी संविधानाच्या तुलनेत मनुस्मृतीलाच महत्त्व दिले होते, असेही राहुल म्हणाले.

याच संसदेत आम्ही जात जनगणना लागू करू, असे वचन दिले होते. ५० टक्के आरक्षणाची भिंत आम्ही पाडून दाखवू, असा पुनरुच्चारही राहुल यांनी केला.

एकलव्याचा दाखला

एकलव्याने जशी तपस्या केली होती तसे देशातील युवक सकाळ- पासून वेगवेगळ्ळ्या परीक्षांची तयारी करतात. मात्र, सरकारने 'अग्निवीर' लागू केले आणि एकप्रकारे युवकांचा अंगठाच कापला. देशात परीक्षेचे पेपर फुटतात तेव्हा एक प्रकारे युवकांचे अंगठेच कापले जातात, असेही ते म्हणाले.

'...हा तर सावरकरांचा अपमान'

सत्ताधारी पक्षाचे लोक संविधान रक्षणाच्या गोष्टी करतात, म्हणजे ते आपले 'सर्वोच्च नेते' सावरकर यांचा एकप्रकारे अपमानच करतात, अशी टीका राहुल यांनी केली. विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर जातीय जनगणना करील आणि आरक्षणाचा ५० टक्क्यांचा अडथळाही दूर करील, असे राहुल गांधी म्हणाले.

'शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करता...'

आपण एका उद्योगपतीला जेव्हा धारावी प्रकल्प, बंदरे आणि विमानतळांची कामे देता, तेव्हा एक प्रकारे देशाचा अंगठाच कापता. शेतकरी किमान हमीभावाची मागणी करतो, तेव्हा आपण दोन बड्या उद्योगपतींनाच लाभ देत शेतकऱ्यांचा अंगठा कापण्याचे काम करता. इंदिरा गांधी यांना मी सावरकर यांच्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, सावरकरांनी इंग्रजांशी जुळवून घेत लेखी माफी मागितली होती. तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, महात्मा गांधी, पंडित नेहरू तुरुंगात गेले; परंतु सावरकरांनी माफी मागितली होती.

 

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा