शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

"हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान", सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:03 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) भागवत यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. 

'परकीय आक्रमण झेलणाऱ्या भारताला खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळाले, जेव्हा राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली', असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा हा महत्त्वाचा दिवस आहे, पण खरं स्वातंत्र्य मिळालं म्हणणं हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेही यावरून टीका केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसचे नेते राशीद अल्वी म्हणाले, "भाजपच्या खासदार कंगना रणौतही असे म्हणाल्या होत्या की, देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं. त्यानंतर आता आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत म्हणत आहेत की, राम मंदिर बनल्यानंतर देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं. मग १५ ऑगस्ट १९४७ काय झालं होतं? २६ जानेवारी या दिवसाचे इतके महत्त्व का आहे?  जर हे खरं स्वातंत्र्य आहे, तर मला हे म्हणताना वेदना होताहेत की, ते महात्मा गांधी आणि सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करत आहेत."

अल्वि पुढे म्हणाले की, "राम मंदिर बनने आणि त्यात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणे निश्चितच एक महत्वाचा दिवस आहे. याबद्दल अजिबात शंका नाही. पण, असं म्हणणं की, प्राण प्रतिष्ठा दिनीच खरे स्वातंत्र्य मिळाले, हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे."

ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना रामाच्या नावावर राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. 

"आरएसएस सरसंघचालक एक सन्मानीय व्यक्ती आहेत, पण ते संविधानाचे निर्माते नाहीत. ते या देशातील कायद्यांचा मसुदा तयार करत नाहीत, त्यात बदल करत नाहीत. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणे, देशासाठी अभिमानाचा क्षण होता आणि मंदिर व्हावे म्हणून सगळ्यांनी योगदान दिले आहे. पण, असा दावा करणे की, देश आता स्वतंत्र झाला आहे, हे चुकीचे आहे. त्यांनी रामलल्लाच्या नावावर राजकारण करायला नको", असे संजय राऊत म्हणाले. 

भारताने अनेक शतके आक्रमणे झेलली 

मोहन भागवत म्हणाले होते की, मागील अनेक शतके भारताने परकीय आक्रमणांना तोंड दिलं. भारताला खरं स्वातंत्र्य मागच्या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिर बनल्यानंतर मिळालं. रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण होत असून, हा दिवस प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला पहिजे", असे विधान भागवत यांनी केले होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतSanjay Rautसंजय राऊतRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ