शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

त्यामुळे बिहार आणि आंध्र प्रदेशला मिळू शकत नाही विशेष राज्याचा दर्जा, असं आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:21 IST

Special Status To State :  मोदी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे आपल्या राज्यासाठी विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र सद्यस्थितीत एक कारण असं समोर येत आहे ज्यामुळे बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता कठीण दिसत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नाही. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर मोदींना सरकार स्थापन करावं लागलं आहे. दरम्यान, या सरकारमध्ये १६ खासदार असलेला तेलुगू देसम पक्ष आणि १२ खासदार असलेल्या जेडीयूची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून आपल्या राज्यासाठी विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र सद्यस्थितीत एक कारण असं समोर येत आहे ज्यामुळे बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळण्याची शक्यता कठीण दिसत आहे.

सध्याच्या तरतुदींनुसार राज्यांसाठी विशेष दर्जा देण्याची व्यवस्था अस्तित्वात नाही. ऑगस्ट २०१४ मध्ये १३ वा योजना आयोग संपुष्टात आणण्यात आला. त्यानंतर १४ व्या वित्त आयोगाने विशेष आणि सामान्य श्रेणीतील राज्ये असा कुठलाही फरक केलेला नाही. त्यावेळी सरकारने १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या. त्यासोबतच १ एप्रिल २०१५ पासून केंद्राकडून राज्यांकडे होणारं कर हस्तांतरणसुद्धा वाढलं आहे. आधी ३२ टक्के असणारं हस्तांतरण आता वाढवून ४२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. तसेच आणखी एका तरतुदीनुसार जर कुठल्याही राज्याकडे संसाधनांची कमतरता असेल तर  त्यांच्यासाठी महसुली तुटीसाठी अनुदान दिलं जाईल, अशीही व्यवस्था करण्यात आली. जुन्या तरतुदींनुसार ज्या राज्यांना विशेष राज्यांचा दर्जा मिळाला आहे त्यामध्ये आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, सिक्किम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर यांचा समावेश आहे. या राज्यांना २०१५ पूर्वी विशेष राज्यांचा दर्जा दिला गेलेला आहे.

आता नव्या तरतुदींनुसार २०१५-१६ मध्ये राज्यांना एकूण कर हस्तांतरण ५.२६ लाख रुपये एवढं करण्यात आलं आहे. ते २०१४-१५ मध्ये ३.४८ लाख रुपये होते. म्हणजेच नव्या तरतुदींमधून त्यात १.७८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामधील राज्यांचा वाटा हा एका फॉर्म्युल्यानुसार निश्चित केला जातो. तसेच राज्यं आपापला कर महसूल गोळा करण्याचा प्रयत्न करतात. हा फॉर्म्युला भौगोलिक आधार, वनक्षेत्र आणि राज्यातील दरडोई उत्पन्न यावरून निश्चित होतो. 

२०१५ साली मार्च महिन्यापर्यंत लागू असलेल्या तरतुदींनुसार विशेष राज्याचा दर्जा मिळालेल्या राज्यांना केंद्र सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी केंद्र सरकारकडून ९० टक्के मदत मिळत असे, तर राज्यांना अवघा १० टक्के वाटा उचलावा लागत असे. आता एनडीए सरकार बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांबाबत पुनर्विचार करू इच्छित असेल तर त्या प्रस्तावाला मान्यतेसाठी १६ वा वित्त आयोग किंवा नीती आयोगाकडे पाठवावं लागेल. दरम्यान, सध्या, बिहार आणि आंध्र प्रदेश बरोबरच ओदिशा, छत्तीसगड आणि राजस्थानकडूनही विषेश राज्याच्या दर्जाची मागणी केली जात आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू