शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

आता भीक देणाऱ्यांवरही दाखल होणार एफआयआर, प्रशासनाकडून मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 20:43 IST

इंदूरला भिकारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात प्रशासनाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२५ पासून इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणाऱ्या लोकांवरही एफआयआर दाखल केला जाणार आहे. यासंबंधीची माहिती सोमवारी (दि.१६) शहरातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. 

इंदूरला भिकारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंदूर शहरात १ जानेवारी २०२५ पासून भिक्षा देणाऱ्या लोकांवरही एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले, "भीक मागण्याविरुद्ध आमची जनजागृती मोहीम या महिन्याच्या अखेरपर्यंत (डिसेंबर) शहरात चालणार आहे. येत्या १ जानेवारीपासून कोणी भिक्षा देताना आढळल्यास, त्याच्याविरुद्धही एफआयआर दाखल केला जाईल."

प्रशासनाने यापूर्वीच शहरात भीक मागण्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत, असे इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, "मी इंदूरच्या सर्व लोकांना आवाहन करतो की, लोकांना भिक्षा देण्याच्या पापात सहभागी होऊ नका." तसेच, गेल्या अनेक महिन्यांत शहर प्रशासनाने भीक मागणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्यांचा पर्दाफाश केल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी दिली आहे.

केंद्र सरकारचा पायलट प्रोजेक्टजिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, प्रशासनाने भीक मागत असलेल्या अनेकांचे पुनर्वसन केले आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. याअंतर्गत देशभरातील १० शहरे भिकारीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इंदूरचाही समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश