शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

इसिस आणि लष्कर-ए-तोयबासारख्या संघटनांपासून धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2015 2:43 AM

इस्लामिक स्टेट्स (इसिस) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) यांसारख्या दहशतवादी संघटनांपासून नव्याने निर्माण झालेल्या धोक्यापासून सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय गृह मंत्रालय

- नबिन सिन्हा,  नवी दिल्लीइस्लामिक स्टेट्स (इसिस) आणि लष्कर-ए-तोयबा (एलईटी) यांसारख्या दहशतवादी संघटनांपासून नव्याने निर्माण झालेल्या धोक्यापासून सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय गृह मंत्रालय आणि इंटेलिजन्स ब्युरो व राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) अन्य गुप्तचर संस्थांनी सर्व राज्यांना दिलेला आहे.इसिसमध्ये सामील होण्याची इच्छा असलेल्या तीन युवकांना शनिवारी नागपूर विमानतळावर अटक करण्यात आल्यानंतर गुप्तचर संस्थांनी महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, झारखंड, केरळ आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांना नव्याने हा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. इसिस आणि एलईटी या दोन्ही संघटना आपली फळी मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय युवकांना लक्ष्य बनवित आहेत आणि अशी भाडोत्री माणसं मिळविण्यासाठी भारत हे सोपे लक्ष्य आहे, असे मत गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केले.इसिस आणि एलईटी यांना इंडियन मुजाहिदीनसारख्या (आयएम) संघटना मदत करीत आहेत. दिल्ली, अहमदाबाद, मुंबईसारखी प्रमुख शहरे आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अन्य काही शहरांवर तसेच राजकीय नेत्यांवर हल्ले करण्याची या दहशतवादी गटांची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नुकत्याच घडून आलेल्या भारत-पाक चर्चेमुळे या गटांना मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळेच हे गट आता चर्चेची ही प्रक्रिया बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहेत, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पोलीस महासंचालकांच्या बैठकीतही या मुद्यावर व्यापक चर्चा करण्यात आली होती. गुप्तचर माहितीचे आदानप्रदान करणे आणि दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने सर्व राज्यांमध्ये समर्पित एटीएस माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रयत्नांमुळेच अलीकडच्या काळात इसिस वा अन्य दहशतवादी संघटनांकडे आकर्षित झालेल्या १० ते १५ युवकांना स्थानबद्ध करण्यात आले, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.