शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पद्म पुरस्कारासाठी दिल्लीतून तिघांची नावे; मुख्यमंत्री केजरीवालांचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 10:53 IST

दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात.

- विकास झाडेनवी दिल्ली : कोविड काळात आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या तीन व्यक्तींची नावे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे पाठविलेली तिघांची नावे जाहीर करून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरोधात राजकारण केले आहे.दरवर्षी पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नावे पाठविली जातात. कोणाला पुरस्कार द्यायचा किंवा नाही यावर मात्र राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब होते.

राज्यांनी पाठविलेली नावे ही याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नाहीत. परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र यासाठी पत्रकार परिषद आयोजित करून आरोग्य क्षेत्रातील तिघांची नावे जाहीर केलीत. त्यांना शुभेच्छाही दिल्यात आणि केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्कार द्यावा अशी विनंती केली आहे.

देशात सर्वात प्रथम प्लाझ्मा बॅँक सुरू केलेल्या आएलबीएस हॉस्पिटलचे डॉ. ए. के. सरीन, एलएनजेपी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश कुमार आणि मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. संदीप बुद्धीराजा यांचा समावेश आहे. केजरीवाल म्हणाले, एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये कोविडच्या २०५०० रुग्णांवर उपचार करण्यात आला. हा आकडा देशात सर्वाधिक होता. 

अशीही ‘पारदर्शकता’-

आपल्या कोणत्याही कामाची केंद्र सरकार दखल घेत नाही असा समज करून अलीकडे मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आम्ही केंद्राकडे कोणत्या मागण्या केल्या या माध्यमांकडे जाहीर करतात. त्याला केजरीवाल सरकारने ‘पारदर्शकता’ असे नाव दिले आहे. या पारदर्शकतेच्या श्रृंखलेत त्यांनी आज पद्म पुरस्कारासाठी ज्यांची नावे पाठवलीत ती जाहीर केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार