शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तबरेज अन्सारी हत्या प्रकरणात ११ जणांवर खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 04:44 IST

अन्सारी याला ठार मारण्याच्या प्रकरणाचा खटला कमजोर केला जात असल्याचे आरोप झाल्यानंतर झारखंड पोलिसांनी आपल्या मूळ भूमिकेपासून घूमजाव केले आहे.

रांची : तबरेज अन्सारी याला ठार मारण्याच्या प्रकरणाचा खटला कमजोर केला जात असल्याचे आरोप झाल्यानंतर झारखंड पोलिसांनी आपल्या मूळ भूमिकेपासून घूमजाव केले आहे. या प्रकरणातील ११ आरोपींवर खुनाचा आरोप ठेवून पुरवणी आरोपपत्र सादर केले.या प्रकरणात कालांतराने पकडलेल्या दोन आरोपींवरही खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तबरेज अन्सारी हा गंभीर जखमी झाल्यामुळे नव्हे, तर तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावल्याचे पोलिसांनी आधी म्हटले होते. मात्र, फोरेन्सिकच्या ताज्या अहवालानंतर पोलिसांनी आपली भूमिका बदलली.पुणे येथे वेल्डर म्हणून काम करणारा तबरेज अन्सारी झारखंडमधील सराईकेला जिल्ह्यातील कडमदिया या आपल्या गावी आला होता. १७ जूनला रात्री धाटकिविध या शेजारील गावातील काही लोकांनी तबरेजला त्याच्या घरातून खेचून बाहेर काढले. चोरीचा आरोप करीत रात्रभर त्याला जबर मारहाण केली. हल्लेखोरांनी तबरेजला जबरदस्तीने ‘जय हनुमान’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणाही द्यायला लावल्या.>सत्य उजेडातझारखंड पोलीस मुख्यालयाने म्हटले आहे की, तबरेज अन्सारीची शवचिकित्सा झाल्यानंतर त्याच्या व्हिसेराचा अहवाल पहिले आरोपपत्र दाखल करेपर्यंत पोलिसांच्या हाती आला नव्हता. तबरेजला वजनदार वस्तूंनी मारहाण करण्यात आली. त्या धसक्याने त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे ताज्या फोरेन्सिक अहवालात म्हटले आहे.