शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 3:42 PM

भाजप खासदार कंगना राणौत यांनी मोठ्या विरोधानंतर केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे परत आणावेत, अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला मोठा विरोध झाला होता. या विरोधानंतर हे कायदे मागे घेण्यात आले होते. दरम्यान, आता हेच तीन कायदे पुन्हा आणण्याची मागणी भाजपा खासदार कंगना राणौत यांनी केली आहे. हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते परत आणण्याची मागणी त्यांनी करायला हवी, असे कंगना रणौत यांनी सांगितले. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. 

कंगना राणौत यांनी सोमवारी मंडीच्या नाचन विधानसभेत कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी  माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही मागणी केली. त्यांच्या विधानावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली आहे. कंगना राणौत यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार

काँग्रेसने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. 'शेतकऱ्यांवर लादलेले तीन काळे कायदे परत आणले पाहिजेत. असे भाजप खासदार कंगना राणौत यांनी सांगितले. देशातील ७५० हून अधिक शेतकरी शहीद झाले, तेव्हाच मोदी सरकारला जाग आली आणि हे काळे कायदे मागे घेण्यात आले. आता भाजप खासदार पुन्हा हे कायदे मागे घेण्याचा विचार करत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खासदारांनी कितीही प्रयत्न केले तरी हे काळे कायदे परत येणार नाहीत',असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

खासदार कंगना राणौत काय म्हणाल्या?

खासदार कंगना राणौत माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या, 'शेतकऱ्यांबाबतचे जे कायदे मागे घेतले आहेत, ते पुन्हा लादले जावेत, असे मला वाटते. हे वादग्रस्त असू शकते, पण मला वाटते की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कायदे परत आले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वतःच त्याची मागणी केली पाहिजे. जेणेकरून इतर ठिकाणांप्रमाणे आमचे शेतकरी समृद्ध होत असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीला कुठेही खंड पडू नये. शेतकरी हा देशाच्या विकासातील प्रमुख शक्तीचा आधारस्तंभ आहे. काही राज्यांमध्ये ज्या तीन कायद्यांवर आक्षेप घेण्यात आला होता, त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ते कायदे स्विकारावेत, अशी विनंती मी त्यांना करू इच्छितो, असंही राणौत म्हणाल्या. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाFarmerशेतकरी