शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

पंजाब सीमेवर त्रिस्तरीय सुरक्षा, १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू; परवानगीनंतरच वाहनांना प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 12:04 IST

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: शेतकरी संघटनांच्या दिल्ली मोर्चाच्या आंदोलनासंदर्भात हरियाणा पोलिसांनी अभेद्य सुरक्षा व्यवस्था केली आहे. पंजाब सीमेवर त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त असेल. सर्वप्रथम बीएसएफचे जवान असतील आणि त्यांच्या मागे आरएएफ आणि आरएएफच्या मागे हरियाणा पोलिसांचे सशस्त्र सैनिक तैनात असतील. पंजाबची सीमा सील करण्याबरोबरच लिंक रोडवर पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले असून १३ फेब्रुवारीला तपासणी आणि परवानगी मिळाल्यानंतरच वाहनांना हरियाणात प्रवेश दिला जाईल.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे कोणत्याही प्रकारची निदर्शने किंवा मोर्चा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यभरातील गुप्तचर विभागाचे कर्मचारी क्षणोक्षणी माहिती गोळा करून मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा हरियाणा पोलिसांनी दिला आहे. कोणत्याही प्रकारचा मजकूर किंवा व्हिडिओ पडताळणीशिवाय सोशल मीडियावर शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

औद्योगिक संघटनांनीही प्रशासनाकडे मागितली मदत

सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, कुंडली, बडी, बहादूरगड आणि लगतच्या विविध औद्योगिक संघटनांनी प्रशासनाला विनंती केली आहे की त्यांनी आंदोलन थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत कारण शेवटच्या आंदोलनामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ते म्हणाले की, राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही पोलीस प्रशासनाला आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली शेतात धावण्यासाठी असून कोणत्याही प्रकारच्या प्रदर्शनासाठी नाही, असे आवाहनही या शेतकरी संघटनांनी केले आहे.

येथून रहदारीची माहिती मिळवा

रहदारीशी संबंधित किंवा इतर महत्त्वाच्या माहितीसाठी, हरियाणा पोलिसांचे सोशल मीडिया अकाउंट @Haryana_Police, @DGPHaryana आणि फेसबुक अकाउंट हरियाणा पोलिस फॉलो करा. या सोशल मीडिया अकाउंटवर सर्व महत्त्वाची माहिती वेळोवेळी अपडेट केली जाईल. तसेच पंजाबला जाणाऱ्या प्रवाशांनी हरियाणा पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या वाहतूक सल्ल्यांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, डायल - ११२ वर संपर्क साधा.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबHaryanaहरयाणाdelhiदिल्ली