शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

तापमानवाढीमुळे तळमळतोय सागराचा ‘प्राण’ !

By admin | Published: September 13, 2014 2:16 AM

समुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे

भारत शिंदे, पणजीसमुद्र आणि समुद्र पृष्ठभागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे सखल भागामध्ये समुद्राचा विस्तार होण्याचा धोका ओळखून मानवाने वेळीच सतर्क होण्याची आवश्यकता असल्याचे असे मत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. डब्ल्यू. ए. नकवी यांनी व्यक्त केले. उल्लेखनिय म्हणजे, याच विषयावर न्यूयॉर्क येथील शिखर बैठकीत चिंतनही केले जाईल.‘हवामान बदल आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम’ या संदर्भात नकवी यांनी ‘लोकमत’शी खास बातचित केली. ते म्हणाले, की समुद्राच्या पाण्यामध्ये विविध स्तर असतात. त्याचे तापमानही वेगवेगळे असते. सर्वात तळातील जलस्तराचे तापमान अत्यंत कमी म्हणजे सुमारे ३ ते ४ सेंटीग्रेड असते. त्याची घनताही जास्त असते. समुद्राच्या बहुतांश पाण्याची घनता सरासरी १.०३ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर असते. त्याचबरोबर समुद्रातील ७५ टक्के पाण्याचे तापमान ० ते ६ डिग्री सेंटीग्रेड असते. खोल समुद्रातील पाण्याचा स्तर आणि ध्रुवीय प्रदेशातील पाणी थंड असते. त्याच्यावर वातावरणातील तापमान बदलाचाही परिणाम होतो.वाढत्या तापमानाचा माशांच्या खाद्यावर, गरम पाण्यामध्ये शेवाळावर तसेच माशांच्या शारीरिक संरचनेवर व प्रजनन क्षमतेवरही वाईट परिणाम दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले.जागतिक स्तरावर विचार केल्यास न्युझीलंडमध्ये समुद्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. हे जर असेच होत राहिले तर न्युझीलंड जगाच्या नकाशावर राहील काय, हा प्रश्न आहे. तेथे जमिनीच्या दरातही कमालीची घसरण झाली आहे. त्या तुलनेत नेदरलँडमध्ये समुद्राचे तापमान स्थिर आहे, असेही नकवी यांनी सांगितले.गोव्यामध्ये करंझाळेसारख्या सखल भागात समुद्राच्या वाढत्या पाण्याचा विस्तार होत आहे. गेल्या महिन्यात मुंबईच्या किनाऱ्यावरील उंच उंच लाटांनी काही परिसर जलमय झाला होता. बांगलादेशास पुराचा तडाखा बसला तर तेथील लोक जीव वाचविण्यासाठी शेजारील भागात म्हणजे भारताच्या सीमावर्ती राज्यात स्थलांतर करतात. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत, याचाही उल्लेख नकवी यांनी केला. सध्या समुद्राचा विस्तार रोखण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान विकसित झालेले नाही.