शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
2
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
3
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
4
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
5
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
6
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
8
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
9
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
10
नवऱ्यामुळे मुलीला HIV, Ex बॉयफ्रेंडने शेवटपर्यंत केली सेवा; काँग्रेस आमदारालाही आले गहिवरून
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
12
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
13
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
14
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
15
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
16
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
17
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
18
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
19
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
20
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई

गेल्या पाच वर्षात देशभरात वाघाचे ३०२ बळी; एकट्या महाराष्ट्रात ५० टक्क्याहून जास्त मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 8:28 PM

केंद्र सरकारकडून पीडितांच्या कुटुंबीयांना एकूण २९ कोटींची नुकसान भरपाई

Tiger Attack : गेल्या पाच वर्षांत देशभरात वाघांच्या हल्ल्यात ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी ५५ टक्क्यांहून अधिक मृत्यू एकाच राज्यातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. आकडेवारीनुसार, केंद्राने पीडितांच्या कुटुंबीयांना 29.57 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून वितरित केले आहेत. सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला लोकसभेला सांगितले की 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यात 112 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 2021 मध्ये 59, 2020 मध्ये 51, 2019 मध्ये 49 आणि 2018 मध्ये 31 लोक मारले गेले होते.

सर्वाधिक आकडा महाराष्ट्रात; गेल्या 5 वर्षात 170 बळी

गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत वाघांच्या हल्ल्यात एकट्या महाराष्ट्रात १७० मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यात 85, 2021 मध्ये 32, 2020 मध्ये 25, 2019 मध्ये 26 आणि 2018 मध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2022 आणि 2021 मध्ये प्रत्येकी 11, 2020 मध्ये चार, 2019 मध्ये आठ आणि 2018 मध्ये पाच जणांचा वाघांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला.

बंगालमध्ये आकडा कमी, बिहारमध्ये मृत्यूच्या प्रमाणात वाढ

पश्चिम बंगालमध्ये गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र गेल्या काही वर्षांत ही संख्या सातत्याने कमी होत आहे. पश्चिम बंगालमध्ये 2018 मध्ये वाघांच्या हल्ल्यात 15 लोकांचा मृत्यू झाला होता, परंतु 2022 मध्ये ही संख्या केवळ एकावर आली आहे. बिहारमध्ये मात्र वाघांच्या हल्ल्यांशी संबंधित मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बिहारमध्ये 2019 मध्ये वाघाच्या हल्ल्यात कोणीही मरण पावले नाही, परंतु 2020 मध्ये एका व्यक्तीला, 2021 मध्ये चार आणि 2022 मध्ये नऊ जणांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे.

राज्य      - मृत्यू (२०२२) - मृत्यू (२०२१)

  • महाराष्ट्र     -       ८५     -     ३२
  • उत्तर प्रदेश -    ११     -     ११
  • पश्चिम बंगाल-    १     -   १५ (वर्ष २०१८)
  • बिहार      -        ९           -      ४
टॅग्स :TigerवाघIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र