शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

कौतुकास्पद! 39 वर्षांपासून गावात एकही गुन्हा नाही; लोकांनी कोर्ट-पोलीस स्टेशन पाहिलंच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 8:26 AM

गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत असतात. पण असं असताना एक कौतुकास्पद घटना आता घडली आहे. मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात एक असं गाव आहे जिथे गेल्या 39 वर्षांपासून पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गावातील लोक पंचायत भरवून परस्पर संमतीने प्रकरणे सोडवतात. त्यामुळे लोकांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरजच पडत नाही. ओरछा या धार्मिक आणि पर्यटन शहराजवळ वसलेले हाथीवर खिरक हे असं गाव आहे की, जिथे गावातील लोकांना गेली 39 वर्षे म्हणजे 1983 पासून पोलीस स्टेशनची गरजच भासली नाही. 

पोलीस ठाण्यात 39 वर्षांत आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. गावातील लोकही पोलीस ठाणे आणि न्यायालयापासून लांब राहतात. जेव्हा पृथ्वीपूरचे एसडीओपी संतोष पटेल या गावात पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की गावातील लोक पोलिसांना ओळखत नाहीत. प्यारी बाई पाल या 100 वर्षांच्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिने गावात कधीही वाद पाहिलेला नाही. पोलीस गावात आले आहेत. पोलीस कसे असतात हे तिला माहीत नाही. गावात कोणताही वाद नसल्याचे गावातील अनेक ज्येष्ठ व तरुण सांगतात. किरकोळ वाद असतील तर ते गावातील ज्येष्ठ मंडळी पंचायत स्तरावर परस्पर संमतीने सोडवतात.

पृथ्वीपूरचे एसडीओपी संतोष पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मला कळले की या गावात 39 वर्षांपासून पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही, तेव्हा हे गाव पहिलं. तिथल्या लोकांशी बोलून व्हिलेज क्राइम नोटबुक तपासले असता 1983 पासून इथे एकही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली. शांतताप्रिय असलेल्या या गावात एक व्यक्ती असामाजिक स्वभावाचा होता पण तो आता गावात राहत नाही. हाथीवर खिरक गावात 225 लोक राहतात. कमी लोकवस्ती असलेल्या या गावात शांतता आणि आनंददायी वातावरण आहे.

गावात पाल आणि अहिरवार बा ब्राह्मण समाजाचे लोक राहतात. सर्व समाजातील लोक परस्पर बंधुभावाने मिळून मिसळून राहतात. सुख-दुःखात नेहमी एकमेकांना साथ देतात. दुरावा, वाद यांसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी जेष्ठ मंडळी समजूत घालून शांत करतात. हाथीवर खिरक गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीसोबतच शेळी, गाय यांसारखे प्राणी पाळणे हा आहे. शेळीपालनामुळे त्यांना रोजगार मिळतो, त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्नही मिळते. गायींच्या संगोपनामुळे गावातील लोकांना दुधाची कमतरता भासत नाही. गावातील लोकही तूप, दुधाचा व्यवसाय करतात. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एका हिंदी  वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस