शहरं
Join us  
Trending Stories
1
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
2
"ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", मोदींचा घणाघात; राहुल गांधींना म्हटलं व्हायरस
3
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
4
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
5
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
6
Team India Batting, IND vs BAN 1st Test: "अरे बाबा, हात जोडतो... एकदा तरी नीट खेळ"; टीम इंडियाच्या 'या' फलंदाजावर नेटकरी नाराज
7
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
8
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!
9
"पापा कहते हैं, "बड़ा नाम करेगा"; R Ashwin च्या वडिलांनी एन्जॉय केली लेकाची फटकेबाजी
10
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
11
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
12
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
13
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
14
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
15
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
16
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
17
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
18
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
19
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
20
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल

'चर्चेची वेळ संपली', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर टोला लगावला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 2:10 PM

भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भाष्य केले.

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसापासून संबंध चिघळले आहेत. दहा वर्षांपासून दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चा जवळपास थांबली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा पाकिस्तानला भेट दिली असली संबंध अजून चिघळले आहेत. दरम्यान, दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या चर्चेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. "पाकिस्तानसोबत अखंड चर्चेचे युग संपले आहे, असं वक्तव्य एस जयशंकर यांनी केले. 

मोठी बातमी! काँग्रेसच्या 'या' २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी; नाना पटोलेंची माहिती

मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, 'पाकिस्तानशी अखंड चर्चेचे युग संपले आहे. जोपर्यंत जम्मू आणि काश्मीरचा संबंध आहे, कलम ३७० रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे आपण पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवू शकतो हा मुद्दा आहे. मला हे सांगायचे आहे की आपण निष्क्रीय नाही आणि घटना सकारात्मक किंवा नकारात्मक दिशा घेत असली तरी आपण कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देऊ.

काही दिवसापूर्वी बांगलादेशात सत्ताबदल झाला आहे. दरम्यान, आता बांगलादेशसोबतच्या संबंधांबाबत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, "आम्हाला तत्कालीन सरकारशी बोलावे लागेल हे स्वाभाविक आहे. राजकीय बदल झाले आहेत आणि ते विस्कळीत होऊ शकतात, हे आम्हाला मान्य करावे लागेल. 

काही दिवसापूर्वी भारताचे मालदिवशीही संबंध बिघडले आहेत.यावर बोलतोना एस जयशंकर म्हणाले, 'मालदीवबद्दलच्या आमच्या दृष्टिकोनात चढ-उतार आले आहेत. येथे स्थिरतेचा अभाव आहे. मालदीवशी आमचे जुने संबंध आहेत. हे नाते त्यांच्यासाठी ताकदीचे आहे, असा विश्वास मालदीवमध्ये आहे. यावेळी त्याच्यासाठी हे नाते खूप महत्त्वाचे आहे कारण ते आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाPakistanपाकिस्तान